शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माथ्यावरून पाणी अन् पायथ्याशी कोरडे

By admin | Updated: April 20, 2016 00:51 IST

पूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे.

व्यथा धानोरी ग्रामस्थांची : लघु कालव्याचे नियोजन अधांतरीअशोक पारधी पवनीपूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे. गोसीखुर्द धरणामुळे उजव्या कालव्याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा जलाशयात १०० किलोमिटर अंतरावर पाणी पोहचले. परंतु कालव्याच्या २५ कि.मी. पर्यंतचे शेतकरी सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. उजव्या कालव्याचे ० ते २५ कि.मी. अंतरापर्यंत तालुक्याचे सीमेतील गाव आहेत. त्यापैकी काही गावातील मोजक्याच शेतकऱ्यांना लघु कालव्याद्वारे सिंचन होऊ लागले आहे. धानोरी सारखे अजूनही कित्येक गाव सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. धानोरी गावाच्या माथ्यावरून उजवा कालव्यामधून पाणी वाहत आहे. परंतु लघु कालव्यांचे नियोजन करण्यात न आल्याने काल्याचे पायथ्याजवळची १०० एकर शेतजमीन कोरडी असून सिंचन सोयी पासून वंचित आहे.गोसीखुर्द धरण राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला. तेव्हा राजकारणी श्रेय लाटण्यात स्वत:ला धन्य समजत होते. वाटेल त्या व्यासपीठावरून लोकांना सांगत सुटले होते की प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु शेतकऱ्यांना सिंचन देण्यात खारूताईचा वाटा उचलण्यात त्यांना धाडस उरलेला नाही. उजवा कालवा वाहत असलेल्या गावात कोरंभी, बेलघाटा, कोदुर्ली, रेवळी,धानोरी, भोजापूर सिंधी, शेडी, खातखेडा, सावरला या गावातील शेतीचा समावेश आहे. या गावातील शेतशिवारात लघु कालवे काढण्यात आलेली आहेत. परंतु हे सर्व अपूर्ण आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे ते उन्हाळी धानाचे पीक घेवू लागले आहेत. पवनी तालुक्यातील लघु कालवे अपूर्ण असल्याने ज्या शेतकऱ्यांचे शेतापर्यंत नेऊन थांबविण्यात आले आहेत त्यांचे शेतात अतिरिक्त पाणी साचत असल् याने त्यांचे नुकसान होत आहे. तर धानोरी, भोजापूर, शेळी, खातखेडा व सावरला गावातील शेतशिवारात लघु कालव्याचे नियोजन न केल्याने कालव्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही. शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. धानोरी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापूर्वी लघु कालवा काढल्यास शंभराहून अधिक एकर शेती सिंचीत होऊ शकते असे अधिकारीवर्गास निवेदन देऊन लक्षात आणून दिले. अधिकारीवर्गांनी मागणीचा विचार करून शेतशिवाराची पाहणी केली व शेतकऱ्यांना आश्वस्त केले. परंतु कालव्याचे नियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे या हंगामात शेती कोरडी आहे. लोकप्रतिनिधी विचार करून शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होवू लागली आहे.