शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

माथ्यावरून पाणी अन् पायथ्याशी कोरडे

By admin | Updated: April 20, 2016 00:51 IST

पूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे.

व्यथा धानोरी ग्रामस्थांची : लघु कालव्याचे नियोजन अधांतरीअशोक पारधी पवनीपूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे. गोसीखुर्द धरणामुळे उजव्या कालव्याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा जलाशयात १०० किलोमिटर अंतरावर पाणी पोहचले. परंतु कालव्याच्या २५ कि.मी. पर्यंतचे शेतकरी सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. उजव्या कालव्याचे ० ते २५ कि.मी. अंतरापर्यंत तालुक्याचे सीमेतील गाव आहेत. त्यापैकी काही गावातील मोजक्याच शेतकऱ्यांना लघु कालव्याद्वारे सिंचन होऊ लागले आहे. धानोरी सारखे अजूनही कित्येक गाव सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. धानोरी गावाच्या माथ्यावरून उजवा कालव्यामधून पाणी वाहत आहे. परंतु लघु कालव्यांचे नियोजन करण्यात न आल्याने काल्याचे पायथ्याजवळची १०० एकर शेतजमीन कोरडी असून सिंचन सोयी पासून वंचित आहे.गोसीखुर्द धरण राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला. तेव्हा राजकारणी श्रेय लाटण्यात स्वत:ला धन्य समजत होते. वाटेल त्या व्यासपीठावरून लोकांना सांगत सुटले होते की प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु शेतकऱ्यांना सिंचन देण्यात खारूताईचा वाटा उचलण्यात त्यांना धाडस उरलेला नाही. उजवा कालवा वाहत असलेल्या गावात कोरंभी, बेलघाटा, कोदुर्ली, रेवळी,धानोरी, भोजापूर सिंधी, शेडी, खातखेडा, सावरला या गावातील शेतीचा समावेश आहे. या गावातील शेतशिवारात लघु कालवे काढण्यात आलेली आहेत. परंतु हे सर्व अपूर्ण आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे ते उन्हाळी धानाचे पीक घेवू लागले आहेत. पवनी तालुक्यातील लघु कालवे अपूर्ण असल्याने ज्या शेतकऱ्यांचे शेतापर्यंत नेऊन थांबविण्यात आले आहेत त्यांचे शेतात अतिरिक्त पाणी साचत असल् याने त्यांचे नुकसान होत आहे. तर धानोरी, भोजापूर, शेळी, खातखेडा व सावरला गावातील शेतशिवारात लघु कालव्याचे नियोजन न केल्याने कालव्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही. शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. धानोरी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापूर्वी लघु कालवा काढल्यास शंभराहून अधिक एकर शेती सिंचीत होऊ शकते असे अधिकारीवर्गास निवेदन देऊन लक्षात आणून दिले. अधिकारीवर्गांनी मागणीचा विचार करून शेतशिवाराची पाहणी केली व शेतकऱ्यांना आश्वस्त केले. परंतु कालव्याचे नियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे या हंगामात शेती कोरडी आहे. लोकप्रतिनिधी विचार करून शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होवू लागली आहे.