शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खडकीतील ग्रामसभेत पाणी पेटले

By admin | Updated: March 19, 2017 00:21 IST

गावातील विहिरीत थेंबभर पाणी नाही. पाणी पुरवठा योजनेची जुनी व नव्याने खोदलेली बोअरवेल्स आतून बुजली. उपसा केल्यानंतरही उपयोगी नाही.

जलसंसाधनांच्या विविध कामांना मंजुरी : वनसमिती नव्याने गठित करण्याचा ठराव करडी (पालोरा) : गावातील विहिरीत थेंबभर पाणी नाही. पाणी पुरवठा योजनेची जुनी व नव्याने खोदलेली बोअरवेल्स आतून बुजली. उपसा केल्यानंतरही उपयोगी नाही. तलाव, विहिरी कोरड्या पडल्याने करायचे तरी काय? अशा आरोप प्रत्यारोपांनी खडकी गटग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली.सभेच्या अध्यक्षस्थानी देवाजी पचघरे होते. यावेळी वनपरिस्थितीकी समिती निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवीत नव्याने समिती निवडण्याचा ठराव घेण्यात आला. खडकी गावात मागील ५० वर्षात कधी न पडलेला पाण्याचा दुष्काळ आहे. गावात वापरण्याचे पाणीही उपलब्ध नाही. सार्वजनिक पाणी पुरवठ्याची साधने कोरडी पडली आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी २० फुटाने खाली गेली. गावासभोवताल बोअरवेल्स खोदण्यात आल्याने व अनिर्बंध पाण्याचा उपसा करण्यात आल्याने गावाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विहिरीतील माती कोरडी पडली आहे. तलावातील पाण्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत गाळाने बुजलेली पाणी पुरवठा योजनेची बोअरवेल्स मशीनद्वारे उपसा करण्याचा प्रयत्न केला. परंतु २५० फुटापर्यंत उपसा केलेली बोअरवेल्स १२० फुटापर्यंत गाळाने बुजली. दुसरी बोअरवेल्स खोदण्याचा प्रयत्न केला असता पुरेसे पाणी बोअरवेल्सला लागले नाही. सभेच्या सुरुवातीला करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी जलयुक्त शिवार योजनेत नवेगाव, जांभळापाणी, दवडीपार, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ७ गावांचा समावेश आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातही परिसरातील गावाचा समावेश असल्याची माहिती दिली. ग्रामसभेत तलाव, बोड्यांचे खोलीकरण, नाल्यांचे खोलीकरण, विहिरीतील गाळांचा उपसा, बंधाऱ्यातील साठलेल्या गाळांचा उपसा, आवश्यश तेथे बंधाऱ्याचे बांधकाम, मजगीची कामे आदींचे नियोजन करून ठराव घेण्यात आले. वादग्रस्त वनपरिस्थितीकी समिती संबंधाने दोन गटात वाद झाला. शेवटी विद्यमान समिती बरखास्त करून नव्याने समितीचे गठण करण्याचा ठराव घेण्यात आला. सभेला सरपंच सारिका धांडे, उपसरपंच क्रिष्णा टेकाम, सर्व ग्रामपंचायत सदस्य करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, भाजपा तालुका अध्यक्ष बाबूजी ठवकर, सुभाष धांडे, तंमुस अध्यक्ष कातोरे, ग्रामसेविका गोकुळा सानप, कृषी सहाय्यक निखारे, रोजगार सेवक श्रीकृष्ण वरकडे, माजी तंमुस अध्यक्ष रामदास धुर्वे, राजेंद्र पुराम, दिनदयाल मदनकर, तिजारे, धांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)