शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा बॅरेजमधून उद्योग समूहाला दिले जाते पाणी

By admin | Updated: May 5, 2016 00:56 IST

एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार

मांडवी-धापेवाडा बॅरेज : खासदारांची चौकशीची मागणीतुमसर : एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार मागील सहा दिवसांपर्यंत सुरू होता. कागदोपत्री पाणी बंद आहे तर प्रत्यक्षात बॅरेजमधून पाण्याचा उपसा सुरू होता. राज्य शासन व या उद्योग समूहाने चार वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर मांडवी-धापेवाडा बॅरेज तयार केले होते. वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. बॅरेजमधून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.एप्रिल महिन्यात या बॅरेज धरणात १० एमएम क्युब पाणी शिल्लक होते, परंतु सद्य स्थितीत केवळ ३ एमएम क्युब पाणी शिल्लक आहे. उर्वरित पाणी येथे कुठे, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.२.५ एम.एम. क्युब पाणी १२ पाणीपुरवठा योजनेकरिता शिल्लक ठेवायचे आहे तर ५ एमएम क्युब पाणी शेतकऱ्यांकरिता राखीव ठेवायचे आहे. ३ एमएम क्युब पाणी बॅरेज मध्ये उपलब्ध असतानी पाण्याची उचल एका मोठा उद्योग समूहाने कशी केली. हा मुख्य प्रश्न आहे.१६ एप्रिल रोजी धापेवाडा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांनी अदानी वीज समूहाला पाण्याचा उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्र्रिल पासून अदानी समूहाने पाण्याचा उपसा बंद केला, अशी माहिती अदानी समूहाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली परंतु वास्तविक स्थिती येथे दुसरीच होती. अदानी समूहाला या बॅरेजमधून १.५ एम एम क्युब पाणी देण्यात येते.२० एप्रिलच्या रात्रीपर्यंत बॅरेजमधून पाणी उपसा सुरू होता, अशी माहिती आहे. दरवर्षी ७ कोटी ५० लक्ष अदानी समूह शासनाला पाणी उपशाचे देते अशी माहिती आहे. अदानी वीज समूह व इतर पाणीपुरवठा योजनेकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. परंतु बावनथडी प्रकल्पात केवळ १० टक्के मृत जलसाठा उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बावनथडी धरणातील पाणी साठ्यावर मध्य प्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. भंडारा व बालाघाटचे जिल्हाधिकारी संयुक्त निर्णयानंतरच पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. (तालुका प्रतिनिधी) अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नयेभंडारा : गायत्री एज्युकेशन सोसायटी, नागपूर व्दारा संचालित गायत्री पब्लिक स्कूल विद्यानगर, गुजराथी कॉलनी, गणेशपूर भंडारा येथे इंग्रजी माध्यमाचे वर्ग १ ते ६ हे अनधिकृत सुरु आहेत. सदर वर्गाला शासनाची मान्यता नाही, अशा अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. सदर वर्गात प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालक व विद्यार्थ्यांची राहील, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. यांनी कळविले आहे.१६ एप्रिल रोजी अदानी समूहाला पाणी उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्रिल रोजी अदानी समूहाने पाणी उपसा बंद केला. नियमानुसार येथे कामे होतात. कागदोपत्री कामे होत नाही.-पद्माकर यासटवार, कार्यकारी अभियंता, तिरोडा.बावनथडी धरणात केवळ १० टक्केच मृत पाण्याचा साठा आहे. पाणीपुरवठा योजनेकरिता पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते शक्य आहे. धरणावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे.-आय.बी. राठोड, उपविभागीय अभियंता तुमसर.