शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाण्याप्रमाणेच वन जीवन आहे

By admin | Updated: March 27, 2017 00:35 IST

सनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे.

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : वनहक्क कायद्याबाबत कायर्शाळा भंडारा : शासनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे. आजघडीला वन कायदे मजबूत व कठीण होत आहेत, त्याची माहिती होणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे पाणी हे जीवन आहे तसेच वन हे सुध्दा जीवन आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या वतीने संरपच, सचिव मेळावा अंतर्गत वनहक्क कायद्याबाबत कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कायर्कारी अधिकारी शरद अहीरे होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, दिलीप तलमले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उत्तमकुमार कळपते, अविल बोरकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अवसरे म्हणाले, वनमंत्र्यांनी राज्यात २ कोटी पेक्षा जास्त वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करुन उच्चांक गाठला आहे. वन हे मानवी जीवनास आवश्यक आहेत. वनावर आधारीत व्यवसाय नागरिकांना मिळाला पाहीजे. सद्या वनात जावून मोह संकलन करणे तसेच इतर वन उपज संकलन करण्यास कायद्यानुसार अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सामूहिक वनहक्क समिती गावात तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे वन मजूरास रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासोबतच या वनहक्क समितीद्वारे वनउपजापासून प्राप्त उत्पन्नातून गावाचा विकास करण्यात येणार आहे. वनहक्क समितीच्या माध्यमातून वन मजूरास रोजगाराचे हक्काचे माध्यम उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. शरद अहिरे म्हणाले, सी.एस.आर मधील सरंपच व सचिव यांना वनहक्काबाबत माहिती व्हावी, याउद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच कायर्शाळेत अंतिम टप्प्यात आपल्या शंकाचे निरसन करुन कामाला लागावे. जिल्ह्यात सिताफळ लागवडीचे कामे झाली आह, त्याचे सुध्दा सुक्ष्म नियोजन करावे, असेही ते म्हणाले. उमेश शर्मा यांनी वनहक्क कायद्याबाबत सांगतांना म्हणाले, हा उत्तम कायदा आहे, परंतु कायद्याच्या अंमलबजावणीस उशिर झाला आहे. या द्वारे मेळघाट सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सामूहिक बायोगॅस सेवा सुरु करुन उर्जेची बचत करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सोपाकोंडा व नवाटोला येथे या कायद्याअंतर्गत उत्कृष्ट काम करण्यात आले आहे. त्याद्वारे गावकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलबध झाल्या आहेत. सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवून नागरिकांचे राहणीमान उंचावणे हा सुध्दा या योजनेचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रास्ताविकात सामूहिक वनहक्क कायद्याबाबत माहिती दिली. वन क्षेत्रातील मजूरास रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, महसूल व ही यंत्रणा सामुहिकरित्या कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत वनहक्क धारकाची कर्तव्ये, आदिवासी विकासासाठी वन हक्क कायदा कसा उपयोगी पडेल. शासनाचा सहभाग वन हक्क कायदा आणि आदिवासींचा विकास, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभागाची कामे, वन हक्काच्या तरतुदी तसचे ग्रामसभाची कर्तव्ये, वन्यजीवन, वन आणि जैवविविधता समितीची स्थापना, संवर्धन व व्यवस्थापन आराखडयाबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा अनेकांनी लाभ घेतला. या कायर्शाळेला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसचिव, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थित लक्षणीय होती. (नगर प्रतिनिधी)