शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाण्याप्रमाणेच वन जीवन आहे

By admin | Updated: March 27, 2017 00:35 IST

सनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे.

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : वनहक्क कायद्याबाबत कायर्शाळा भंडारा : शासनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे. आजघडीला वन कायदे मजबूत व कठीण होत आहेत, त्याची माहिती होणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे पाणी हे जीवन आहे तसेच वन हे सुध्दा जीवन आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या वतीने संरपच, सचिव मेळावा अंतर्गत वनहक्क कायद्याबाबत कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कायर्कारी अधिकारी शरद अहीरे होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, दिलीप तलमले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उत्तमकुमार कळपते, अविल बोरकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अवसरे म्हणाले, वनमंत्र्यांनी राज्यात २ कोटी पेक्षा जास्त वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करुन उच्चांक गाठला आहे. वन हे मानवी जीवनास आवश्यक आहेत. वनावर आधारीत व्यवसाय नागरिकांना मिळाला पाहीजे. सद्या वनात जावून मोह संकलन करणे तसेच इतर वन उपज संकलन करण्यास कायद्यानुसार अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सामूहिक वनहक्क समिती गावात तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे वन मजूरास रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासोबतच या वनहक्क समितीद्वारे वनउपजापासून प्राप्त उत्पन्नातून गावाचा विकास करण्यात येणार आहे. वनहक्क समितीच्या माध्यमातून वन मजूरास रोजगाराचे हक्काचे माध्यम उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. शरद अहिरे म्हणाले, सी.एस.आर मधील सरंपच व सचिव यांना वनहक्काबाबत माहिती व्हावी, याउद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच कायर्शाळेत अंतिम टप्प्यात आपल्या शंकाचे निरसन करुन कामाला लागावे. जिल्ह्यात सिताफळ लागवडीचे कामे झाली आह, त्याचे सुध्दा सुक्ष्म नियोजन करावे, असेही ते म्हणाले. उमेश शर्मा यांनी वनहक्क कायद्याबाबत सांगतांना म्हणाले, हा उत्तम कायदा आहे, परंतु कायद्याच्या अंमलबजावणीस उशिर झाला आहे. या द्वारे मेळघाट सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सामूहिक बायोगॅस सेवा सुरु करुन उर्जेची बचत करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सोपाकोंडा व नवाटोला येथे या कायद्याअंतर्गत उत्कृष्ट काम करण्यात आले आहे. त्याद्वारे गावकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलबध झाल्या आहेत. सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवून नागरिकांचे राहणीमान उंचावणे हा सुध्दा या योजनेचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रास्ताविकात सामूहिक वनहक्क कायद्याबाबत माहिती दिली. वन क्षेत्रातील मजूरास रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, महसूल व ही यंत्रणा सामुहिकरित्या कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत वनहक्क धारकाची कर्तव्ये, आदिवासी विकासासाठी वन हक्क कायदा कसा उपयोगी पडेल. शासनाचा सहभाग वन हक्क कायदा आणि आदिवासींचा विकास, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभागाची कामे, वन हक्काच्या तरतुदी तसचे ग्रामसभाची कर्तव्ये, वन्यजीवन, वन आणि जैवविविधता समितीची स्थापना, संवर्धन व व्यवस्थापन आराखडयाबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा अनेकांनी लाभ घेतला. या कायर्शाळेला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसचिव, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थित लक्षणीय होती. (नगर प्रतिनिधी)