शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याप्रमाणेच वन जीवन आहे

By admin | Updated: March 27, 2017 00:35 IST

सनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे.

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : वनहक्क कायद्याबाबत कायर्शाळा भंडारा : शासनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे. आजघडीला वन कायदे मजबूत व कठीण होत आहेत, त्याची माहिती होणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे पाणी हे जीवन आहे तसेच वन हे सुध्दा जीवन आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या वतीने संरपच, सचिव मेळावा अंतर्गत वनहक्क कायद्याबाबत कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कायर्कारी अधिकारी शरद अहीरे होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, दिलीप तलमले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उत्तमकुमार कळपते, अविल बोरकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अवसरे म्हणाले, वनमंत्र्यांनी राज्यात २ कोटी पेक्षा जास्त वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करुन उच्चांक गाठला आहे. वन हे मानवी जीवनास आवश्यक आहेत. वनावर आधारीत व्यवसाय नागरिकांना मिळाला पाहीजे. सद्या वनात जावून मोह संकलन करणे तसेच इतर वन उपज संकलन करण्यास कायद्यानुसार अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सामूहिक वनहक्क समिती गावात तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे वन मजूरास रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासोबतच या वनहक्क समितीद्वारे वनउपजापासून प्राप्त उत्पन्नातून गावाचा विकास करण्यात येणार आहे. वनहक्क समितीच्या माध्यमातून वन मजूरास रोजगाराचे हक्काचे माध्यम उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. शरद अहिरे म्हणाले, सी.एस.आर मधील सरंपच व सचिव यांना वनहक्काबाबत माहिती व्हावी, याउद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच कायर्शाळेत अंतिम टप्प्यात आपल्या शंकाचे निरसन करुन कामाला लागावे. जिल्ह्यात सिताफळ लागवडीचे कामे झाली आह, त्याचे सुध्दा सुक्ष्म नियोजन करावे, असेही ते म्हणाले. उमेश शर्मा यांनी वनहक्क कायद्याबाबत सांगतांना म्हणाले, हा उत्तम कायदा आहे, परंतु कायद्याच्या अंमलबजावणीस उशिर झाला आहे. या द्वारे मेळघाट सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सामूहिक बायोगॅस सेवा सुरु करुन उर्जेची बचत करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सोपाकोंडा व नवाटोला येथे या कायद्याअंतर्गत उत्कृष्ट काम करण्यात आले आहे. त्याद्वारे गावकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलबध झाल्या आहेत. सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवून नागरिकांचे राहणीमान उंचावणे हा सुध्दा या योजनेचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रास्ताविकात सामूहिक वनहक्क कायद्याबाबत माहिती दिली. वन क्षेत्रातील मजूरास रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, महसूल व ही यंत्रणा सामुहिकरित्या कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत वनहक्क धारकाची कर्तव्ये, आदिवासी विकासासाठी वन हक्क कायदा कसा उपयोगी पडेल. शासनाचा सहभाग वन हक्क कायदा आणि आदिवासींचा विकास, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभागाची कामे, वन हक्काच्या तरतुदी तसचे ग्रामसभाची कर्तव्ये, वन्यजीवन, वन आणि जैवविविधता समितीची स्थापना, संवर्धन व व्यवस्थापन आराखडयाबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा अनेकांनी लाभ घेतला. या कायर्शाळेला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसचिव, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थित लक्षणीय होती. (नगर प्रतिनिधी)