शेतकऱ्यांना दिलासा : बाळा काशीवारांच्या प्रयत्नाला यशलाखांदूर : गोसेखुर्द डावा कालव्याचे चुकीचे बांधकाम केल्याने कालवा व पाणी असूनही शेतात पाणी पोहचत नसल्याची कैफीयत शेतकऱ्यांनी आ. बाळा काशीवारांपुढे मांडली. जेसीबी व शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने तात्काळ कालवा उपसून व उपाययोजना करून अखेर शेतात पाणी पोहोचविले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.संपूर्ण चौरास भागात गोसेखुर्द डाव्या कालव्याचे अर्धवट जाळे पसरल आहे. काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी गेट नाही. अनेक ठिकाणी कालव्याला भेगा पडल्याने बेवारस पाणी वाहत आहे तर कालव्यात जंगल वाढलेले आहे. त्यामुळे पाणी असून करपलेल्या धानपिकाला पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आ. बाळा काशीवार यांचेकडे धाव घेवून समस्या ऐकूण तात्काळ बेलाटी, तई बु., हरदोली, तई, परसोडी कालव्यांची पाहणी केली असता भयानक वास्तव दिसून आले. तई बु. येथे टिकाराम फुंडे यांच्या शेताजवळ कॅनलमधील वाटर फॉलची उंची नियमानुसार १ मीटर असायला पाहिजे. मात्र अभियंत्यांच्या चुकीमुळे २.५ मीटर उंची वाढविण्यात आली होती. त्यामुळे १ हजार एकर शेतजमीन पाण्यापासून वंचित होती. धानपीक वाचविणे गरजेचे असल्याने स्वत: खर्चातून ब्रोकनद्वारे कांक्रीट तोडून पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला.नेरला लिफ्ट एरिगेशन मधून कॅनलद्वारे पाणी खांबाळी, बोरगावजवळ शिवाजी तिवाडे यांचे शेताजवळ कंत्राटदाराच्या चुकीमुळे २०० मीटर कॅनलचे काम अपूर्ण होते. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील १३ गावातील शेती पाण्यापासून वंचित होती. तक्रार प्राप्त होताच आ. काशीवार यांनी खुद्द शेतीची व कॅनलची पाहणी करून नेरला व कॅनलची पाहणी करून नेरला लिफ्ट एरीगेशनचे कार्यकारी अभियंता मेंढे यांना तत्काळ बोलावून जेसीबीच्या सहायाने २०० मीटर कालव्याचा मार्ग मोकळा करून दिल्याने हजारो एकर शेती सिंचित झाली.यावेळी वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतात ऐन वेळेवर पाणी पोहचल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आ. बाळा काशीवार, माजी जि.प. सदस्य गोपी भेंडारकर, मनोज चुटे, शेषराव वंजारी, रमेश मटाले, होमराज भेंडारकर व शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अखेर शेतात पाणी पोहचले
By admin | Updated: September 15, 2016 00:34 IST