शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:55 IST

भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : गत २२ महिन्यांपासून जुन्या व्हॉल्वमधून पाण्याची गळती, तुमसर शहरात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तुमसर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २० ते २२ महिन्यापासून व्हाल्वमधून पाण्याची गळती सुरू आहे. व्हाल्व दुरूस्ती न केल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरू आहे. येथील व्हाल्व व जलवाहिन्या अनेक वर्षे जुनी आहेत. अनेकांचे आयुष्य संपले आहे. परंतु किमान तज्ञ तंत्रज्ञांना पाचारण करून तात्पुरती दुरूस्ती करण्याची गरज येथे आहे.तुमसरकरांकरिता नवीन जलवाहिनी, जलकुंभाची कोट्यवधीची योजना मंजूर करण्यात आली असून युद्धस्तरावर पाणीपुरवठा योजनेची कामे मागील सहा ते आठ महिन्यापासून सुरू आहेत. कवलेवाडा बॅरेजमधून येथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठे व्हाल्व आहेत. ही पाईपलाईन जुनी व बीड या धातूपासून बनली आहे. सदर व्हाल्वमधून नियमित पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून पाणी व्यर्थ वाया जात आहे.सदर व्हाल्वची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न येथील कर्मचारी, अभियंत्यांनी केला, परंतु त्यात यश आले नाही, अशी माहिती आहे. पुन्हा संपूर्ण दुरूस्तीकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. आता दुरूस्तीची कामे सुरू केली तर शहरात पाण्याकरिता हाहाकार माजेल. मुख्य व्हाल्व असल्याने व जीर्ण जलवाहिनी असल्याने दुरूस्ती करणे येथे तारेवरची कसरत आहे. पालिका प्रशासनही येथे हतबल दिसत आहे. मौल्यवान पाण्याचे जपून वापर करावा, असे सांगण्यात येते. व्यर्थ पाणी कसा जात असल्याने समाजमन सुन्न निश्चित होते.गत २२ महिन्यापासून व्हाल्व लिकेज असल्याचे माहित असताना आता हातवर केले जात आहे. नगर पालिका प्रशासनाने येथे मार्ग काढून दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता महेंद्र देवडे यांनी केली आहे.