शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:55 IST

भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : गत २२ महिन्यांपासून जुन्या व्हॉल्वमधून पाण्याची गळती, तुमसर शहरात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तुमसर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २० ते २२ महिन्यापासून व्हाल्वमधून पाण्याची गळती सुरू आहे. व्हाल्व दुरूस्ती न केल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरू आहे. येथील व्हाल्व व जलवाहिन्या अनेक वर्षे जुनी आहेत. अनेकांचे आयुष्य संपले आहे. परंतु किमान तज्ञ तंत्रज्ञांना पाचारण करून तात्पुरती दुरूस्ती करण्याची गरज येथे आहे.तुमसरकरांकरिता नवीन जलवाहिनी, जलकुंभाची कोट्यवधीची योजना मंजूर करण्यात आली असून युद्धस्तरावर पाणीपुरवठा योजनेची कामे मागील सहा ते आठ महिन्यापासून सुरू आहेत. कवलेवाडा बॅरेजमधून येथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठे व्हाल्व आहेत. ही पाईपलाईन जुनी व बीड या धातूपासून बनली आहे. सदर व्हाल्वमधून नियमित पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून पाणी व्यर्थ वाया जात आहे.सदर व्हाल्वची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न येथील कर्मचारी, अभियंत्यांनी केला, परंतु त्यात यश आले नाही, अशी माहिती आहे. पुन्हा संपूर्ण दुरूस्तीकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. आता दुरूस्तीची कामे सुरू केली तर शहरात पाण्याकरिता हाहाकार माजेल. मुख्य व्हाल्व असल्याने व जीर्ण जलवाहिनी असल्याने दुरूस्ती करणे येथे तारेवरची कसरत आहे. पालिका प्रशासनही येथे हतबल दिसत आहे. मौल्यवान पाण्याचे जपून वापर करावा, असे सांगण्यात येते. व्यर्थ पाणी कसा जात असल्याने समाजमन सुन्न निश्चित होते.गत २२ महिन्यापासून व्हाल्व लिकेज असल्याचे माहित असताना आता हातवर केले जात आहे. नगर पालिका प्रशासनाने येथे मार्ग काढून दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता महेंद्र देवडे यांनी केली आहे.