शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

शहरात पाणीटंचाईचे संकट बळावले

By admin | Updated: May 26, 2017 01:57 IST

शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे

महिलांची भटकंती : दूषित पाण्याने आजार फोफावलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने महिलांची भटकंती वाढली आहे. दुसरीकडे दुषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शहरात १० हजारांच्यावर खाजगी नळधारक असून ३५० पेक्षा जास्त सार्वजनिक नळ आहेत. वैनगंगा नदीपत्रातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी जलशुद्धीकरण करूनही मिळणारे पाणी दूषित आहे. दशकभरापासून भेडसावत असलेल्या या समस्येवर अजुनपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. नगरपालिकेत कुणाचीही सत्ता असो परंतु पाणी प्रश्नावर आजपर्यंत हा प्रश्न गांभीर्याने घेण्यात आला नाही. नवीन प्रस्ताव तयार करून विभागाकडे पाठविण्यात आला असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. जुन महिना लागायला पाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येवून ठेपले असतानाही पालिका प्रशासनाने मुलभूत घटक असलेल्या पाण्याच्या मुद्यावर गंभीरतेने निर्णय घेतलेला दिसून येत नाही. नगरपालिकेत किंबहूना राज्यातही भाजपची सरकार आहे परंतु शंभर सव्वाशेकोटी रूपयांची योजना आणायला किंवा निधी उपलब्ध करायला एवढा कालावधी लागत असेल तर सत्ता कुठल्या कामाची असाही प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.कालबाह्य झालेली जलवाहिनीचार दशकांपुर्वी पाण्याची जलवाहिनी घालण्यात आली होती. परिणामी ही जलवाहीनी कित्येक ठिकाणाहून लिकेज आहे याची नेमकी माहितीही पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डा खोदून ठेवणेही शक्य नाही. अशा स्थितीत कालबाह्य झालेली जलवाहिनी उखाडून फेकणे हाच एकमेव पर्याय आहे. पाणी पुरवठ्याच्या भविष्यकालीन योजनावर सर्वेक्षणही झाले आहे. प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबी प्रकर्षाने मंजूर करून आगामी काळात त्यावर काम सुरू होणे महत्वाचे आहे. मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकारशहरातील उत्तर-पुर्व दिशेला वसलेल्या व नेहरू वॉर्डात व गौतम बुद्ध वॉर्ड परिसरात मागील दहा दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील काही वॉर्डामध्ये नगरसेवकांच्या मदतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मेंढा परिसरात किमान टँकरनेतरी पाणीपुरवठा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वॉर्डातील नगरसेवक या गंभीर समस्येकडे लक्ष देतील काय, असा सवाल वॉर्डवासी विचारीत आहे.