शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बेदखल गावांचे शिवारात चांदपूर जलाशयाचे पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाचे पाणी वाटपाचे नियोजन गडगडल्याने पाण्याचा अपव्यय सुरू झाला आहे. डावा कालवाअंतर्गत ...

रंजित चिंचखेडे

चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाचे पाणी वाटपाचे नियोजन गडगडल्याने पाण्याचा अपव्यय सुरू झाला आहे. डावा कालवाअंतर्गत असणाऱ्या बेदखल गावांचे शिवारात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे भुवया उंचावल्या आहेत. धानाचे लागवडीसाठी पाणी दिले नाही; परंतु पाण्याचा खुलेआम अपव्यय होत असताना पाटबंधारे विभागाची यंत्रणा निद्रिस्त असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान खरिपाचे नर्सरी पेरणीत दिल्या जाणाऱ्या पाणी वाटपात अडचणी येणार आहेत.

सिहोरा परिसरात डावा कालवाअंतर्गत गावांचे शेतशिवारात उन्हाळी धान पिकांना चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. गावांना पाणी वाटपाचे नियोजन करताना अनेक गावांचे शेतशिवाराला डच्चू देण्यात आले आहे. देवरी देव, सुकली नकुल, गोंडीटोला, बपेरा गावांचे शेतशिवार वगळण्यात आले होते. वाढीव हेक्टर आर क्षेत्रात पाणीपुरवठा होणार नाही. असे कारण पुढे करीत या गावांचे शेत वगळण्यात आले होते. शेतकरी पाणी वितरण व करारबद्ध करण्याची ओरड करीत होते; परंतु पाटबंधारे विभागाचे यंत्रणेने ऐकले नाही. परंतु झाले उलटेच पाणी वाटपातून वगळण्यात आलेल्या गावातच चांदपूर जलाशयाचे पाणी शिरले आहे. नाले ओवरफ्लो होऊन वाहत आहेत. शेतीत धानाचे लागवडीसाठी पाणी मिळाले नाही; परंतु पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाचे यंत्रणेचे नियोजन गडगडल्याने पाणी नाले आणि नदीला वाहून जात आहे.

चांदपूर जलाशयाचे पाणी खरेदी केलेले आहे. खरीप हंगामात धानाचे नर्सरी लागवडीसाठी पाणी वितरणाची परंपरा या परिसरात जोपासली जात आहे; परंतु जलाशयाचे पाणी विनाकारण वाहून जात असल्याने खरीप हंगामात पाणी वितरण करताना अडचणी येणार आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी चिकारमधून वितरण करण्यात येत आहे. या चिकारचे गेट नादुरुस्त असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाशित केले आहे. चिकरचे गेट आता बंदच होत नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नियोजनात नसताना कालवाअंतर्गत पाणी सोडण्यात आले आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरण करणारे कालवे, नहर, पडचाऱ्या जीर्ण झाले आहेत. आऊटलेटची कामे शिल्लक आहेत. पाटबंधारे विभाग मनुष्यबळ नसल्याचे तुणतुणे हलवीत आहे. शेतकरी गोंधळात अडकला आहे. करारबद्ध शेती करून पाणी मागण्याची तयारी करीत असताना पाणी दिले जात नाही. वातानुकूलित खोलीत बसून अधिकारी नियोजन करीत असल्याने सिहोरा परिसरातील शेती अधिक प्रमाणात ओलिताखाली आणली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात शेतकरी सुजलाम सुफलाम झाले नाहीत. चांदपूर जलाशयाचे पाणी महागडे असताना पाण्याचा अपव्यय यंत्रणा करीत आहे. खाकेत कळसा अन् गावाला वळसा अशी अवस्था झाली आहे. चांदपूर जलाशय आणि नहर, कालवे, चिकार दुरुस्तीवरून कुणी छातीठोकपणे बोलायलाच तयार नाही. यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांना संपर्क साधले असता होऊ शकले नाही.

बॉक्स

चिकारची नादुरुस्ती भीतीदायक

चांदपूर जलाशयाचे वाणी विसर्ग करण्यासाठी चिकारचे बांधकाम धरणावर करण्यात आले आहे. या चिकारला एक गेट लावण्यात आले आहे. चिकारमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याची साठवणूक टाकीत करण्यात येत आहे. या टाकीला उजवा आणि डावा कालव्याचे मुख्य गेट आहेत. टाकीतील पाण्याचा विसर्ग कालव्यात करण्यात येत आहे. चिकारमधून पाण्याचा विसर्ग करताना हादरे बसत असल्याचा अनुभव कर्मचारी घेत आहेत. चिकारचे गेट उघडल्यानंतर जिवांचे आकांताने कर्मचारी पळापळ करताना दिसून येत आहेत. चिकारची दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची ओरड नवीन नाही; परंतु कुणी मनावर घेत नाही. चिकार धोकादायक असल्याची माहिती वरिष्ठांना आहे. लोकप्रतिनिधी बोंबलत नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी तिजोरी उघडण्यात येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणात गडबड होत असल्याचे चित्र आहे.