शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

धो-धो बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:00 IST

रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देसूरनदी तुडुंब, रोवणी पाण्याखाली : संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाने तासभर हजेरी लावली. त्यानंतर काहीसा उघाड दिला आणि दुपारी व सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत तारांबळ उडविली. या पावसामुळे शहरातील नाल्या तुंबून वाहत होत्या. या पहिल्याच पावसाने भंडारा नगर पालिकेची पोलखोल केली आहे. नाल्यामधील कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाविरूद्ध जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.मासळ परिसरात पऱ्हे पाण्याखालीमासळ : काल रात्रीपासून मुसळधार पावसाने लाखांदूर तालुक्यासह मासळ परिसराला चांगलेच झोडपले. परिणामी, सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. खोलगट भागात पाणी साचले आहे. पेरणी विलंबाने सुरू झाल्यामुळे रोवणीही उशिरा होत आहे. या पावसाने आठ दिवसात रोवणी योग्य होणारे धानाचे पऱ्हे पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.आणखी दोन दिवस हे पऱ्हे पाण्यात राहिले तर पºहे सडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीचा बेत आखला होता आता त्यांना रोवणीसाठी दोन दिवसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महसूल विभागानुसार पावसाची नोंद ७२ मिली एवढी करण्यात आली असून पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसाने शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे.पवनारा परिसरात पाणीच पाणीपवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात शुक्रवारला सकाळपासून जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे बहुतांश ठिकाणचे पऱ्हे पाण्याखाली आले. ४० टक्के पºहे सडण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले आहे. पेरणीसाठी पुन्हा बियाणे कुठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.लोहारा परिसरात जोरदार पाऊसजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील लोहारा व जांब, कांद्री परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आनंदी झाले आहेत. यावर्षीचा हा पहिलाच चांगला पाऊस पडल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला जोमाने लागलेला आहे. कृषीपंपधारक शेतकरी धानाच्या रोवणीसाठी सज्ज झाले असून आता रोवणीला प्रारंभ होणार आहे.पवनी तालुक्यात अतिवृष्टीगुरूवार रात्रीपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कालचा सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात झाला असून ११४.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे पवनी तालुक्यात जिकडे-तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.सरासरी ४० मि.मी. पावसाची नोंदजिल्ह्यात झालेल्या एकूण पावसाची २८५.५ मि.मी. इतकी नोंदविण्यात आलेली असून सरासरी ४०.८ मि.मी. ईतकी आहे. सर्वात कमी १३.२ मि.मी. पाऊस मोहाडी तालुक्यात बरसला.पाऊस कुठे, किती?तालुका पाऊसभंडारा 34.1 मि.मी.मोहाडी 13.2 मि.मी.तुमसर 48.0 मि.मी.पवनी 114.8 मि.मी.साकोली 16.4 मि.मी.लाखांदूर 42.2 मि.मी.लाखनी 16.8 मि.मी.एकूण 285.5 मि.मी.सरासरी 40.8 मि.मी.