शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

चुकारे न मिळाल्यास बावनथडी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST

तुमसर : शासनाने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून रब्बी (उन्हाळी) धानाचे पीक खरेदी केले होते सदर पिकाची खरेदी होऊनसुद्धा २ महिन्यांच्याही ...

तुमसर : शासनाने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून रब्बी (उन्हाळी) धानाचे पीक खरेदी केले होते सदर पिकाची खरेदी होऊनसुद्धा २ महिन्यांच्याही वर काळ झाला मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व पूर्ण बोनस मिळालेला नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी लावलेली शेती वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले शासनाने तत्काळ धानाचे चुकारे ३१ ऑगस्टपर्यंत करावे अन्यथा दि १ सप्टेंबर रोजी बावनथडी प्रकल्पात शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

शासनाने उन्हाळी धान खरेदी करून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिले नाही. बोनसची ही अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी उधार उसने व सावकाराकडून कर्ज काढून कसेबसे पावसाळी धानाचे रोहने लावले आहेत; मात्र आता कीटकनाशक औषध व खत या करिता शेतकऱ्यांकडे रोकड पैसे नाहीत. धान पीक वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

आधीच शेतकऱ्यांना धानाचे ५० टक्के बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व आता रोवणी झालेले धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात दमडी ही नसल्याने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना रब्बी (उन्हाळी) धानाचे चुकारे व राहिलेला ५० टक्के बोनस शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यावर आलेले संकट दूर करावे, अशी मागणी करून दि ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास दि. १ सप्टेंबर रोजी परिसरातील शेतकरी मिळून बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा तोफलाल रहांगडाले व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.