शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

चुकारे न मिळाल्यास बावनथडी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST

तुमसर : शासनाने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून रब्बी (उन्हाळी) धानाचे पीक खरेदी केले होते सदर पिकाची खरेदी होऊनसुद्धा २ महिन्यांच्याही ...

तुमसर : शासनाने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून रब्बी (उन्हाळी) धानाचे पीक खरेदी केले होते सदर पिकाची खरेदी होऊनसुद्धा २ महिन्यांच्याही वर काळ झाला मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व पूर्ण बोनस मिळालेला नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी लावलेली शेती वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले शासनाने तत्काळ धानाचे चुकारे ३१ ऑगस्टपर्यंत करावे अन्यथा दि १ सप्टेंबर रोजी बावनथडी प्रकल्पात शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

शासनाने उन्हाळी धान खरेदी करून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिले नाही. बोनसची ही अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी उधार उसने व सावकाराकडून कर्ज काढून कसेबसे पावसाळी धानाचे रोहने लावले आहेत; मात्र आता कीटकनाशक औषध व खत या करिता शेतकऱ्यांकडे रोकड पैसे नाहीत. धान पीक वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

आधीच शेतकऱ्यांना धानाचे ५० टक्के बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व आता रोवणी झालेले धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात दमडी ही नसल्याने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना रब्बी (उन्हाळी) धानाचे चुकारे व राहिलेला ५० टक्के बोनस शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यावर आलेले संकट दूर करावे, अशी मागणी करून दि ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास दि. १ सप्टेंबर रोजी परिसरातील शेतकरी मिळून बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा तोफलाल रहांगडाले व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.