शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दिव्यांगांच्या समस्यांविषयी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:45 IST

दिव्यांग व्यक्ती समान संधी संपूर्ण हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५ दिनांक ७ फेब्रुवारी १९९६ पासून लागू झाला आहे. तसेच दिव्यांग ...

दिव्यांग व्यक्ती समान संधी संपूर्ण हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५ दिनांक ७ फेब्रुवारी १९९६ पासून लागू झाला आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ हा कायदा २७ डिसेंबर २०१६ पासून लागू करण्यात आला. या कायद्यानुसार दिव्यांग म्हणजे सर्वांगीण विकासासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे; परंतु या कायद्याची संपूर्ण अधिकारी व पदाधिकारी यांना जाणीव असूनसुद्धा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दिव्यांगांना अनेक चुकीच्या धोरणांमुळे जगणे कठीण होत आहे. त्यासाठी दिव्यांगांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग मानधन दर महिन्याला देण्यात यावे, दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा देण्यात यावी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद कार्यालयांमधील अपंगांना घरकुल यामध्ये जातीचा उल्लेख न करता प्राधान्य देण्यात यावे, दिव्यांग शेतकरी बंधू-भगिनी यांचे ५० टक्के कर्ज माफ करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांगांना जातीची अट रद्द करण्यात यावी, अंत्योदय राशन कार्डच्या इष्टांक त्वरित वाढ करून दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय राशन कार्डवरील राशन देण्यात यावा, शासकीय व निमशासकीय कार्यालय व कार्यालय परिसरात दिव्यांगांना २०० चौरस फूट जागा देण्यात यावी, दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दिव्यांग अधिनियम २०१६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांग व्यक्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, कुटुंबप्रमुख वा कुटुंबात दिव्यांग असेल अशा कुटुंबात घरपट्टीमध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी, दिव्यांग बांधवांना कुटुंबप्रमुखाची अट न लावता शौचालयाचे शासनामार्फत बांधकाम करून देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रवी मने, जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, उमराव डोकिरमारे, एकनाथ बाभरे, सीमा कोसरे, रामचरण गोमासे, चरणदास सोनवाने, जितेंद्र नागदेवे, पप्पू बोंद्रे, किशोर शहारे, सुनील कहालकर, मनीष पटले, रवी रामटेके, साधना भुरे, चेतन सूरकर, प्रमोद भुरे उपस्थित होते.