शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 22, 2016 00:28 IST

जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही.

श्रीरामनगरातील बोअरवेल बंद : तुमसरकरांना सोडले वाऱ्यावर, नगरसेवकांचा आरोपतुमसर : जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही. तर दुसरीकडे संपुर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी श्रीराम नगरातील बोअरवेलच्या पंपात बिघाड आला. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होवू शकत नसल्यामुळे तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत दोन दिवसापासून हाहाकार माजला. असतांना मुख्याधिकाऱ्यानि मात्र कार्यालयातून लापता राहून तुमसरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला आहे. पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीने तळ गाढले. साधारणत: मार्च महिण्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र तुमसर तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची चणचण भासणे सुरु झाली. मात्र जिवनदायनी वैनगंगेने तुमसरकरांना ती चणचण भासू दिली नव्हती. परंतू जसजसी उष्णता वाढू लागली तसतसी वैनगंगाही आटू लागताच न.प. ने पाण्याचे स्त्रोत बदलविले व पाणी पुरवठा केला. दरम्यान तुमसरातील नगरसेवकांनीही पाण्याचा धर्म पाळत. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून टँकरची व्यवस्था करुन श्रीराम नगरातील बोअरवेल पाणी शहरात वाटप केले. निवडणुकीचा अपवाद वगळता नगरसेवक मौलाचे कार्य करीत होते. त्यामुळे मुख्याधिकारी हे बेफिर होवून वावरत होते. त्यामुळे कार्यालयात दोन दोन तिन तिन दिवस गैरहजर राहणे हे त्यांच्या नित्याचे झाले. एकीकडे नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु न.प. प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही. खुद नगरसेवकांनी पुढाकार धेवून व पैसे खर्च करुन पाणी वाटप करित असतांना मुख्याधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा नगर सेवकांना पवनी व पडल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच रोष दर्शविला होता व पुढे येणाऱ्या अडचणीही सांगितल्या होत्या. परंतू मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी कानाडोळा केला व आजघडीला तुमसर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगेचे पात्र आटले व मोटारपंपात रेती शिरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर दुसरीकडे ज्या बोअरवेल मधील पाणी टँकरमध्ये भरला जायचा तिचीही मोटार बंद पडल्याने टँकरनेही पाणी पुरवठा बंद झाला आहे. असे असताना मुख्याधिकारी लापता आहेत. त्यावरुन मुख्याधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे दिसून आले. आहे. असा आरोप पक्षनेता प्रमोद तितीरमारेनी पिण्याच्या पाण्याची समस्या ही जर वेळीच निकाली निघाली नाही तर तुमसर न.प. वर काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत दुरध्वनी केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. (शहर प्रतिनिधी)