शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 22, 2016 00:28 IST

जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही.

श्रीरामनगरातील बोअरवेल बंद : तुमसरकरांना सोडले वाऱ्यावर, नगरसेवकांचा आरोपतुमसर : जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही. तर दुसरीकडे संपुर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी श्रीराम नगरातील बोअरवेलच्या पंपात बिघाड आला. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होवू शकत नसल्यामुळे तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत दोन दिवसापासून हाहाकार माजला. असतांना मुख्याधिकाऱ्यानि मात्र कार्यालयातून लापता राहून तुमसरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला आहे. पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीने तळ गाढले. साधारणत: मार्च महिण्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र तुमसर तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची चणचण भासणे सुरु झाली. मात्र जिवनदायनी वैनगंगेने तुमसरकरांना ती चणचण भासू दिली नव्हती. परंतू जसजसी उष्णता वाढू लागली तसतसी वैनगंगाही आटू लागताच न.प. ने पाण्याचे स्त्रोत बदलविले व पाणी पुरवठा केला. दरम्यान तुमसरातील नगरसेवकांनीही पाण्याचा धर्म पाळत. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून टँकरची व्यवस्था करुन श्रीराम नगरातील बोअरवेल पाणी शहरात वाटप केले. निवडणुकीचा अपवाद वगळता नगरसेवक मौलाचे कार्य करीत होते. त्यामुळे मुख्याधिकारी हे बेफिर होवून वावरत होते. त्यामुळे कार्यालयात दोन दोन तिन तिन दिवस गैरहजर राहणे हे त्यांच्या नित्याचे झाले. एकीकडे नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु न.प. प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही. खुद नगरसेवकांनी पुढाकार धेवून व पैसे खर्च करुन पाणी वाटप करित असतांना मुख्याधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा नगर सेवकांना पवनी व पडल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच रोष दर्शविला होता व पुढे येणाऱ्या अडचणीही सांगितल्या होत्या. परंतू मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी कानाडोळा केला व आजघडीला तुमसर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगेचे पात्र आटले व मोटारपंपात रेती शिरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर दुसरीकडे ज्या बोअरवेल मधील पाणी टँकरमध्ये भरला जायचा तिचीही मोटार बंद पडल्याने टँकरनेही पाणी पुरवठा बंद झाला आहे. असे असताना मुख्याधिकारी लापता आहेत. त्यावरुन मुख्याधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे दिसून आले. आहे. असा आरोप पक्षनेता प्रमोद तितीरमारेनी पिण्याच्या पाण्याची समस्या ही जर वेळीच निकाली निघाली नाही तर तुमसर न.प. वर काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत दुरध्वनी केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. (शहर प्रतिनिधी)