शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ग्रामीण भागात मजुरांची कामासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:31 IST

भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.

ठळक मुद्देरोहयो अपयशी : धान काढणीनंतर शेतमजुरी ठप्प, तरुणांची धाव महानगराकडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्याच गावाजवळ काम उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असतो. परंतु मंजूर झालेली कामेही केली जात नाही. तर काही कामे थेट मशिनच्या सहाय्याने करून मजुरांच्या हातचे काम हिरावून घेतले जाते. त्यामुळे धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे रबी आणि उन्हाळी पीक क्षेत्र घटले. परिणामी मजुरांना मजुरी उपलब्ध होत नाही. अनेक मजूर आता शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेचे काम सुरु झाले तर या मजुरांना कामे मिळू शकतात. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार तरुण नागपूर, मुंबई, पुणे, रायपूर आदी शहरांकडे धाव घेत आहेत. कोणत्याही खेड्यात सध्या गेल्यास तेथील तरुण वर्ग कामाच्या शोधात बाहेर असल्याचेच दिसून येते. एकीकडे रोजगार हमी योजनेच्या कामाचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे मजुरांना काम द्यायचे नाही, अशी अवस्था दिसून येते. प्रशासनानेच लक्ष देणे गरजेचे आहे.गांधी चौकात वाढली गर्दीभंडारा शहरातील गांधी चौकात सकाळी मजूर काम मिळेल या आशेने एकत्र येतात. या ठिकाणी विविध ठेकेदार आणि ज्यांना मजुरांची गरज आहे ती मंडळी येतात. हंगामात येथे मजुरांची संख्या कमी दिसायची. परंतु गत काही दिवसांपासून गांधी चौकात मजुरांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. यात मोठ्या प्रमाणात महिलाही असतात. अनेक मजुरांना दुपारी २ वाजेपर्यंत ताटकळत राहूनही काम मिळत नसल्याने निराश होऊन गावी जावे लागते.