शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ग्रामीण भागात मजुरांची कामासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:31 IST

भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.

ठळक मुद्देरोहयो अपयशी : धान काढणीनंतर शेतमजुरी ठप्प, तरुणांची धाव महानगराकडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्याच गावाजवळ काम उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असतो. परंतु मंजूर झालेली कामेही केली जात नाही. तर काही कामे थेट मशिनच्या सहाय्याने करून मजुरांच्या हातचे काम हिरावून घेतले जाते. त्यामुळे धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे रबी आणि उन्हाळी पीक क्षेत्र घटले. परिणामी मजुरांना मजुरी उपलब्ध होत नाही. अनेक मजूर आता शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेचे काम सुरु झाले तर या मजुरांना कामे मिळू शकतात. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार तरुण नागपूर, मुंबई, पुणे, रायपूर आदी शहरांकडे धाव घेत आहेत. कोणत्याही खेड्यात सध्या गेल्यास तेथील तरुण वर्ग कामाच्या शोधात बाहेर असल्याचेच दिसून येते. एकीकडे रोजगार हमी योजनेच्या कामाचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे मजुरांना काम द्यायचे नाही, अशी अवस्था दिसून येते. प्रशासनानेच लक्ष देणे गरजेचे आहे.गांधी चौकात वाढली गर्दीभंडारा शहरातील गांधी चौकात सकाळी मजूर काम मिळेल या आशेने एकत्र येतात. या ठिकाणी विविध ठेकेदार आणि ज्यांना मजुरांची गरज आहे ती मंडळी येतात. हंगामात येथे मजुरांची संख्या कमी दिसायची. परंतु गत काही दिवसांपासून गांधी चौकात मजुरांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. यात मोठ्या प्रमाणात महिलाही असतात. अनेक मजुरांना दुपारी २ वाजेपर्यंत ताटकळत राहूनही काम मिळत नसल्याने निराश होऊन गावी जावे लागते.