शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

‘फाईव्ह-जी’कडेच वाटचाल, मात्र गाडा अडकला ‘थ्री जी’तच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

बहुधा शहरी भागासह ग्रामीण भागात नेटचा खोडा निर्माण होतो. अशा समस्या असताना पुढे-पुढे जाताना थोडे मागे वळून पाहिलेले बरे! ...

बहुधा शहरी भागासह ग्रामीण भागात नेटचा खोडा निर्माण होतो. अशा समस्या असताना पुढे-पुढे जाताना थोडे मागे वळून पाहिलेले बरे! सध्या पाचव्या पिढीकडे मोबाईल जात असताना हल्लीच्या टू-जी , थ्री-जी , फोर-जी या सेवाच व्यवस्थित मिळत नाहीत. तरीही फाईव्ह-जीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आधी पूर्वीच्या सेवा व्यवस्थित व सुरळीत करणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढील पाऊल यशस्वी पडू शकेल. विविध कंपनींच्या मोबाईल नेटवर्क तथा नेटमध्ये सदैव अडचणी येतात. त्यामुळे ग्राहकही वैतागले आहेत. फोर-जी चे रिचार्ज मारून नेटचा स्पीड मिळत नाही, अशा प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारी आहेत. थ्री-जी, फोर-जी ची चाके रुतलेली असताना केवळ नावापुरतेच पुढे जाणे का? सेवा मात्र पूर्वीची मिळेल. शिवाय रिचार्जचा खर्च वाढणार. मात्र, त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. नेहमीच ग्राहकांना नेटवर्क, नेटच्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजेच मोठा आर्थिक भुर्दंड सोसूनही ग्राहकांनी गप्प बसायचे का? असा सवाल अनेक ग्राहक करीत आहेत. तेव्हा विज्ञानातील प्रगती सर्वांना मान्य आहे. पुढे जायला हरकत नाही. मात्र, मागील परिस्थिती नीट करूनच पुढे जावे. फाईव्ह-जीकडे वाटचाल करताना मोबाईल कंपन्यांनी थोडे मागे वळून पाहायला हवे. आताच्या काळातील वेगवान व स्पर्धात्मक युगात मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळावी, ही ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे.