शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजारावर शेतकरी कृषिपंपासाठी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे ...

ठळक मुद्देदीड वर्षापासून पायपीट कायम : विद्युत वितरण कंपनीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे चित्र आहे.सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. शेतकºयांना विहीर देण्यासाठी शासन तत्पर आहे. परंतु या विहिरीतील पाणी शेतपिकांना देण्यासाठी विद्युत कनेक्शन देण्यास विद्युत वितरण कंपनी अपयशी ठरली आहे. धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावरच अवलंबून आहे.धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. दरवर्षी कर्ज घेऊन चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगविणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतपीक वाया जात आहे. तर उन्हाळी पिकांची लगावड करण्याचे स्वप्न यंदा केवळ स्वप्नच राहिले.जिल्ह्यातील तीन हजाराच्या घरात शेतकºयांनी कृषीपंपाकरीता विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज कनेक्शन मागीतले. परंतु मागील दीड वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकºयांना अद्यापही वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले.गोंदिया तालुक्यातील ४९३, गोरेगाव तालुक्यातील ४३४, तिरोडा ४५६, आमगाव १४८, सालेकसा २३७, देवरी २३३, सडक-अर्जुनी ३१२, अर्जुनी-मोरगाव ५०७ अशा एकूण शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनकरीता डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही. त्यामुळे वीज जोडणी केव्हा करुन मिळणार यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित आहेत.टेंडरच्या नावावर टाळाटाळशेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी मागील दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. कृषिपंपाचे कनेक्शन देण्यासाठी कंत्राट देण्याची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सर्व शेतकऱ्यांना सांगून मागील वर्षभरापासून एकच पाढा विद्युत वितरण कंपनी वाचत आहे. टेंडर प्रक्रिया सुरु असल्याच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.वर्षभरापासून मोटारपंपासाठी कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले. परंतु वर्ष लोटूनही अद्यापही कनेक्शन न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे.प्रेमलाल बोहरे- साखरीटोला (सातगाव),

टॅग्स :agricultureशेती