शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजारावर शेतकरी कृषिपंपासाठी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे ...

ठळक मुद्देदीड वर्षापासून पायपीट कायम : विद्युत वितरण कंपनीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे चित्र आहे.सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. शेतकºयांना विहीर देण्यासाठी शासन तत्पर आहे. परंतु या विहिरीतील पाणी शेतपिकांना देण्यासाठी विद्युत कनेक्शन देण्यास विद्युत वितरण कंपनी अपयशी ठरली आहे. धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावरच अवलंबून आहे.धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. दरवर्षी कर्ज घेऊन चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगविणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतपीक वाया जात आहे. तर उन्हाळी पिकांची लगावड करण्याचे स्वप्न यंदा केवळ स्वप्नच राहिले.जिल्ह्यातील तीन हजाराच्या घरात शेतकºयांनी कृषीपंपाकरीता विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज कनेक्शन मागीतले. परंतु मागील दीड वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकºयांना अद्यापही वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले.गोंदिया तालुक्यातील ४९३, गोरेगाव तालुक्यातील ४३४, तिरोडा ४५६, आमगाव १४८, सालेकसा २३७, देवरी २३३, सडक-अर्जुनी ३१२, अर्जुनी-मोरगाव ५०७ अशा एकूण शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनकरीता डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही. त्यामुळे वीज जोडणी केव्हा करुन मिळणार यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित आहेत.टेंडरच्या नावावर टाळाटाळशेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी मागील दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. कृषिपंपाचे कनेक्शन देण्यासाठी कंत्राट देण्याची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सर्व शेतकऱ्यांना सांगून मागील वर्षभरापासून एकच पाढा विद्युत वितरण कंपनी वाचत आहे. टेंडर प्रक्रिया सुरु असल्याच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.वर्षभरापासून मोटारपंपासाठी कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले. परंतु वर्ष लोटूनही अद्यापही कनेक्शन न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे.प्रेमलाल बोहरे- साखरीटोला (सातगाव),

टॅग्स :agricultureशेती