शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी 'पुरुषोत्तमची' प्रतीक्षा

By admin | Updated: March 20, 2017 00:18 IST

उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच...

दुर्दम्य इच्छाशक्ती : एका तासात मारतो १, ८८० भारतीय दंड भंडारा : उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत जिल्हा आणि देशाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर, त्यात वावगे काय? इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि यशस्वी होण्याची तळमळही आहे. परंतू आड येते आहे, ती 'आर्थिक' चणचण! भारतीय दंड (इंडियन पुशअप) मारण्याचा 'रेकॉर्ड' गिनीज बुकमध्ये नोंदविण्यासाठी नोंदणी शुल्क देण्याची क्षमता नसलेला व ६० मिनीटात १८८० दंड मारणारा हा तरुण केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाकडे डोळे लावून आहे. आता ही स्वप्नपूर्ती दात्यांच्या हातभारातूनच शक्य म्हणावी लागेल!भारतीय व्यायाम पद्धती सोपी नाही. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीतूनच माणूस यात निपून होऊ शकतो. असाच एक विशिष्ट ध्येयाने वेडा झालेला तरुण भंडारा शहरात आहे. व्यायामाने शरीर मजबूत आणि आरोग्य सुदृढ राहते. हे ठिक असले तरी व्यायामातूनच स्वत:चे वेगळेपणही सिद्ध केले जाऊ शकते, हेच या तरुणाने दाखवून दिले आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या येथील पुरुषोत्तम चौधरी यांनी वयाची ४५ वर्ष गाठली. परंतू विश्वविक्रम करण्याची जिद्द मात्र अजून सोडली नाही. वयाच्या १४ व्या वर्षांपासून येथील बहिरंगेश्वर व्यायामशाळेत नियमित सरावाला सुरुवात केली. पाच भारतीय दंडकांपासून सुरुवात करणाऱ्या पुरुषोत्तम याने सरावात सातत्य ठेवल्याने शंभर, दोनशे आणि एका तासात १४५० दंडकापर्यंत कधी पोहचला हे कळलेच नाही. सातत्याच्या जोरावरच २०१२ साली त्याच्या या विक्रमाची नोंद लिमका बुकमध्ये झाली. प्रशासनाकडून त्यावेळी त्याचा गौरवही झाला होता. पहिला गढ पार केल्यानंतर गिनीज बुकात आपला विक्रम नोंदविण्यासाठी त्याने धडपड सुरु केली. यात सातत्य आणि प्रचंड मेहनत आहे. मात्र सर्वकाही असताना पैसा हा अडसर ठरीत आहे. जागतिक स्तरावर विक्रम नोंदविण्यासाठी भरावयाचे नोंदणी शुल्कच अवाढव्य आहे. येणाऱ्या मिळकतीतून शुल्क भरणे त्याला शक्य नाही. मात्र प्रयत्न अजूनही सोडलेले नाहीत. २०१२ पासून त्याची ही धडपड सुरु आहे. कुणाचा तरी मदतीचा हात पाठिशी येऊन जिल्ह्यासह देशाचे नाव या अस्सल भारतीय क्रीडा प्रकारात आपल्याला उंचावता येईल, अशी अपेक्षा त्याला आजही आहे. शासन स्तरावर क्रीडापटूंच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांना सोयीसुविधा मिळाव्या म्हणून निधीही खर्च केला जातो. अशावेळी एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद करण्याची क्षमता ठेऊन असलेल्या तरुणाच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. मदत मिळाल्यास मेहनतीच्या जोरावर हे यश सहज गाठता येईल. (नगर प्रतिनिधी)