शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

प्रकल्पग्रस्त मोबदल्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 2, 2016 00:59 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बांधतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले होते.

शासन निर्णयाला केराची टोपली : अधिकाऱ्यांचा कारभारपुरुषोत्तम डोमळे सानगडीविदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बांधतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले होते. यापैकी भंडारा व नागपुर जिल्ह्यातील ११ हजार १२९ कुटुंबापैकी ७ हजार ३१५ कुटुंबांना लाभ देण्यात आला. उर्वरितांना नोकरीऐवजी एकरकमी मोबदला देण्यासाठी शासनाने निर्णय क्रमांक नुसार अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. परंतु आजतागायत वाढीव कुटुंबांना व रिक्त भूखंड धारकांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला नसल्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. यानुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम देण्याचे शासनाने निश्चित केले होते. स्वतंत्र वाढीव कुटुंबांना लाभ देण्यासाठी विहीत नमुनेतील शपथपत्र, शपथपत्र करणाऱ्याचे ओळखपत्र, २१ मार्च १९९७ पूर्वी स्वतंत्र कुटुंब असल्याबाबत विधानसभेच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारयादीची नक्कलप्रत, विवाह झाल्याबाबत लग्नाचे प्रमाणपत्र, नावात बदल केल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा २१ मार्च १९९७ पूर्वीचा जन्माचा दाखला, स्वतंत्र कुटुंब गावात राहत असल्याचा दाखला यासह अनेक जाचक अटीचा समावेश असल्यामुळे घेतले. त्या शिबिरात काहींनी शपथपत्र भरुन दिले तर काहींनी शपथपत्र भरुन दिले नाही. तसेच रिक्त भूखंडधारक प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी एकमुस्त २ लाख ९० हजार रुपयांचा लाभ देण्यात यावा, असे शासन आदेशात नमूद असतानाही उपविभागीय अधिकारी भंडारा तसेच पुनर्वसन अधिकारी भंडारा यांच्या अडेलटटू धोरणामुळे आजपर्यंत लाभ देण्यात आला नाही.असा मिळणार होता लाभनोकरीऐवजी एकमुस्त रक्कम म्हणून २.९० हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार होते. एका कुटुंबाच्या नावावर एकापेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या पैकी १ हजार १४५ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. एका घरावर एकापेक्षा जास्त कुटुंबांची नावे आहेत अशापैकी काहींना लाभ मिळाला असून आता उर्वरितांना लाभ मिळणार. निवाड्यानुसार कुटुंबाचे नावे रिक्त भूखंड दर्शविण्यात आले असून त्यांनासुध्दा एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार.अधिसूचनेच्या दिवशी गावात राहत असल्याचा पुरावा सादर केल्यास एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात यावा. असे आदेशात स्पष्ट नमूद असतानासुध्दा प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे व शासकीय अधिकाऱ्याचा मनमर्जी कारभार असल्यामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना इंदिरासागर प्रकल्प शाप ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी येतात. शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत घोषणा देतात. पण त्यांच्या घोषणा हवतेच विरताना दिसतात. इंदिरा सागर प्रकल्पामुळे बाधितांना मोबदला न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. भविष्यात प्रकल्पग्रस्तांनी मोबदला न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे काही शेतकऱ्यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांनी वरील गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.