शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पवनीला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:39 IST

ऐतिहासिक महत्त्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे.

ठळक मुद्देपालिका झाली १५० वर्षांची : ऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक महत्त्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिकदृष्ट्या अविकसीत असलेल्या नगरातील नगर पालिकेला १५० हून अधिक वर्षे झालेली आहेत.नगरात १५० पेक्षा अधिक मंदिर अद्यापही सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही दुर्लक्षित आहेत. वैनगंगा नदी किनाºयावरील वैजेश्वर घाट, दिवाणघाट, ताराबाईचा घाट व पवनखिंड (खिडकी) असे महत्वाचे घाट आहेत. प्राचीन जवाहर गेट व परकोट आहे. ११ गरूड खांब आहेत. पुरातत्व विभागाने उत्खनन करून शोधलेले भव्य असे बौद्ध स्तुपाचे अवशेष आहेत. नगरात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे पंचमुखी सर्वलोभद्र गणेश आहे. सोबतीला महाकाय रांजीचा गणपती व धरणीधर गणेश सुद्धा आहे. दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात चंडीका माता, नदीकाठावर दुर्गा माता, गावातील मध्यवर्ती ठिकाणी एकविरा माता, कुºहाडा तलावालगत भंगार माता, कोरंभी रोडवरील टेकडीवर कालका व ज्वाला माता, जगन्नाथ मंदिर, दत्त मंदिर, मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, वैजेश्वर मंदिर, निलकंठेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, राम मंदिर, धोबी तलाव, मारोती मंदिर, एकटांग्या हनुमान मंदिर, टेंभेस्वामीचे मंदिर, भूतेश्वर मंदिर आणि गधादेव मंदिर सुद्धा आहे. भगवान शंकराची पिंड असलेले कित्येक मंदिर नगरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहेत. असे मंदिर अस्तित्वात आहेत. एवढा सगळा वैभव पवनी नगरात असूनही पर्यटनक्षेत्र म्हणून गावाचा विकास होवू शकला नाही.तालुक्यात गोसेखुर्द इंदिरा सागर धरण, उमरेड पवनी, कºहांडला वन्यजीव अभयारण्य स्थळ येथील महासभाधिभूमी असे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. नगरात वर्षभर वेगवेगळ्या मंदिरात महाप्रसाद, भोजनदान, भजन कीर्तन व इतरही उत्सव सुरु असतात. परंतु सर्व पर्यटन क्षेत्राला एकसुत्रात बांधून त्यांचा विकास करावा असा दृष्टीकोण रुढ होवू शकला नाही. पवनीचा मागासलेपण अद्यापही कायम आहे. तालुक्याचे ठिकाण असले तरी दर्जेदार व उच्च शिक्षण मिळेल अशा शाळा महाविद्यालय नाही. तंत्रशिक्षणाची सोय नाही. वैद्यकीय शिक्षण तर नाहीच. पर्यटन व शिक्षण असे दोन पर्याय पवनी गावाला विकासाच्या वाटेवर घेवून जावू शकत असल्याने लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती ठेवून पवनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.