शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

८० हजार बेरोजगारांना नोकरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:45 IST

नोंदणी झाल्यावर नोकरी मिळेल, अशी शक्यता आता नाहीच. देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरूणांच्या शक्तीचा उपयोग विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांना काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ एकट्या भंडारा जिल्ह्यात जवळपास ८० हजार बेरोजगार तरूण आहेत. श्रीमतांच्या मुलांना नोकरीची टेंशन नाही, पण आम्ही काय करायचे असा, प्रश्न ही तरूणाई विचारीत आहे.

ठळक मुद्देजनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नोंदणी झाल्यावर नोकरी मिळेल, अशी शक्यता आता नाहीच. देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरूणांच्या शक्तीचा उपयोग विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांना काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ एकट्या भंडारा जिल्ह्यात जवळपास ८० हजार बेरोजगार तरूण आहेत. श्रीमतांच्या मुलांना नोकरीची टेंशन नाही, पण आम्ही काय करायचे असा, प्रश्न ही तरूणाई विचारीत आहे.उद्योगधंद्याच्या बाबतीत मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. शासनातीह थेट भरती बंद आहे. परीक्षा, मुलाखत दिल्यावरही पैसे मोजल्याशिवाय नौकरी लागत नाही. अशात शासकीय कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यावरच तरूण स्व:तचे समाधान करून घेतात. बेरोजगारी भत्ता ही संकल्पना केव्हाच मागे पडली. एक नव्हे, दोन नव्हे चक्चक हजारोंच्या संख्येने तरूण नोकरीच्या अपेक्षेत आहेत.दरवर्षी हजारोंच्या संख्येने तरूण शिक्षित होऊन नोकरीच्या शोधात भटकत असतात.अनेक बेरोजगार तरूण -तरूची लहान-मोठ्या कामाच्या शोधात आहे.मागील दशकभराच्या तुलनेत सन २०१७-२०१८ मध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. यातही मिळेल ते काम करण्याची मानिसकता बदलत चालली आहे. ग्रामीण क्षेत्रातून नोकरीसाठी येणाऱ्या तरूणांचा लोंढा आजही कायम आहे. मात्र यात तरूणांची लुबाडणूकही सुरू आहे. नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली व काही प्रमाणात न समलेल्या गोष्टींचा फायदा असामाजिक त्तत्व सहजपणे उचलत आहे. तरूण टॅकनोसॅव्हीही आहे. डोक्यात रोजगारासाठी अनेक पर्याय उपल्बध असले तरी भांडवलाची समस्या आहे.तज्ज्ञ म्हणतात, नियोजनाचा फटकाजिल्ह्यात उद्योगधद्यांची वाढ झालेली नाही. हजारो तरूणांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे अस्याई व कंत्राटी कामगारांचा भरणा केला जातो. त्यातही जिल्हयाऐवजी परप्रातीयांचा भरणा असतो. ही खरचं गंभीर बाब आहे. याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे.- श्रीकांत पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि.कामगार संघटना.शासनाच्या दुटप्पी धोरणांमुळेच उद्योगधद्यांची निर्मिती झाली नाही. बेरोजगारांसह कंत्राटी कामगारांच्या संमस्या सुटलेल्या नाहीत. बेरोजगारांना रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहराकडे पलायन करावे लागते. उद्यागधंदे उभारायला भांडवल व जागेचा प्रश्नही निर्माण होत असतो. बेरोजगारांच्या समस्यांकडे गांर्भीयाने बघितले पाहिजे.- युवराज रामटेके, अध्यक्ष, राज्य वन कामगार संघटना जि.भंडारा