शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

८० हजार बेरोजगारांना नोकरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:45 IST

नोंदणी झाल्यावर नोकरी मिळेल, अशी शक्यता आता नाहीच. देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरूणांच्या शक्तीचा उपयोग विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांना काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ एकट्या भंडारा जिल्ह्यात जवळपास ८० हजार बेरोजगार तरूण आहेत. श्रीमतांच्या मुलांना नोकरीची टेंशन नाही, पण आम्ही काय करायचे असा, प्रश्न ही तरूणाई विचारीत आहे.

ठळक मुद्देजनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नोंदणी झाल्यावर नोकरी मिळेल, अशी शक्यता आता नाहीच. देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरूणांच्या शक्तीचा उपयोग विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांना काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ एकट्या भंडारा जिल्ह्यात जवळपास ८० हजार बेरोजगार तरूण आहेत. श्रीमतांच्या मुलांना नोकरीची टेंशन नाही, पण आम्ही काय करायचे असा, प्रश्न ही तरूणाई विचारीत आहे.उद्योगधंद्याच्या बाबतीत मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. शासनातीह थेट भरती बंद आहे. परीक्षा, मुलाखत दिल्यावरही पैसे मोजल्याशिवाय नौकरी लागत नाही. अशात शासकीय कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यावरच तरूण स्व:तचे समाधान करून घेतात. बेरोजगारी भत्ता ही संकल्पना केव्हाच मागे पडली. एक नव्हे, दोन नव्हे चक्चक हजारोंच्या संख्येने तरूण नोकरीच्या अपेक्षेत आहेत.दरवर्षी हजारोंच्या संख्येने तरूण शिक्षित होऊन नोकरीच्या शोधात भटकत असतात.अनेक बेरोजगार तरूण -तरूची लहान-मोठ्या कामाच्या शोधात आहे.मागील दशकभराच्या तुलनेत सन २०१७-२०१८ मध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. यातही मिळेल ते काम करण्याची मानिसकता बदलत चालली आहे. ग्रामीण क्षेत्रातून नोकरीसाठी येणाऱ्या तरूणांचा लोंढा आजही कायम आहे. मात्र यात तरूणांची लुबाडणूकही सुरू आहे. नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली व काही प्रमाणात न समलेल्या गोष्टींचा फायदा असामाजिक त्तत्व सहजपणे उचलत आहे. तरूण टॅकनोसॅव्हीही आहे. डोक्यात रोजगारासाठी अनेक पर्याय उपल्बध असले तरी भांडवलाची समस्या आहे.तज्ज्ञ म्हणतात, नियोजनाचा फटकाजिल्ह्यात उद्योगधद्यांची वाढ झालेली नाही. हजारो तरूणांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे अस्याई व कंत्राटी कामगारांचा भरणा केला जातो. त्यातही जिल्हयाऐवजी परप्रातीयांचा भरणा असतो. ही खरचं गंभीर बाब आहे. याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे.- श्रीकांत पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि.कामगार संघटना.शासनाच्या दुटप्पी धोरणांमुळेच उद्योगधद्यांची निर्मिती झाली नाही. बेरोजगारांसह कंत्राटी कामगारांच्या संमस्या सुटलेल्या नाहीत. बेरोजगारांना रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहराकडे पलायन करावे लागते. उद्यागधंदे उभारायला भांडवल व जागेचा प्रश्नही निर्माण होत असतो. बेरोजगारांच्या समस्यांकडे गांर्भीयाने बघितले पाहिजे.- युवराज रामटेके, अध्यक्ष, राज्य वन कामगार संघटना जि.भंडारा