शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून घरकूल योजनेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 16, 2017 00:32 IST

अठराशे साठ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान निवारा योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.

घरावर ताडपत्री टाकून वास्तव्य : पालोरा येथील प्रकार, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षनिश्चित मेश्राम पालोरा (चौ.) अठराशे साठ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान निवारा योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. मात्र ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या व प.समिच्या सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे गरजू लाभार्थ्यांना वगळले जात आहे. यात येथील भूमिहीन व गरजू लाभार्थी किसन प्रमेश्वर रंगारी हा मागील अनेक वर्षापासून पडक्या घरावर ताडपत्री टाकून आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत आहे. राहते घर जीर्ण झाल्यामुळे केव्हाही कोसळू शकतो. संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देवून या लाभार्थ्यांची पाहणी करून घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे.पवनी पंचायत समिती अंतर्गत पालोरा हे गाव ग्रा.पं. लोकप्रतिनिधीमुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपले व्होट बँक वाचविण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गावात येणाऱ्या शासकीय योजना गरजू व गरीब लाभार्थ्यांना न मिळता धनाढ्यांना मिळत आहे. २०११ मध्ये पंतप्रधान निवारा योजनेकरिता लाभार्थ्यांची पाहणी करण्यात आली. या अंतर्गत पुन्हा २०१५ -१६ ला पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी करून यादी प्रकाशित करण्यात आली. या यादींमध्ये जवळपास २१ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील चार लाभार्थ्यांचे कागदोपत्रे सुद्धा मागविण्यात आले आहेण या २१ लाभार्थ्यांपैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे राहते घर पक्के आहेत. अनेकांकडे उत्पादनांचे चांगले साधन आहे. अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीवर कार्यरत आहेत. मात्र पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा किसन ताडपत्री वापरून वास्तव्य करीत आहे. त्याचे कुटुंब मात्र का दिसले नही. असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या यादीमध्ये अनेक धनाढ्य लाभार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामसभेत गरजू लाभार्थ्यांचे नाव देवून सुद्धा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नसेल तर गावातील ग्रामसभेचे महत्व काय आहे. घराची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबांकडे का कानाडोळा केला आहे. ज्या लाभार्थ्यांकडे खाली जागा आहे. मात्र पक्के घर बांधायला पैसे नाहीत असे अनेक लाभार्थी दुसऱ्याच घरी किरायाने राहत असून अनेकांनी नातेवाईकांचा आसरा घेऊन राहत आहेत. किसनच्या घराची परिस्थिती अगदी वेळी आहे. जीव मुठीत घेऊन हा कुटुंब वास्तव्य करीत आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण घराला ओलावा असतो. घराच्या सभोवतालच्या भिंती कोसळल्या आहेत. छताचे खापरे फुटलेले असून लाकडी साहित्य कुजलेले आहेत. वारंवार ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना मागणी करून सुद्धा याकडे परस्पर दुर्लक्ष करण्यात आले. असा आरोप या लाभार्थ्यांनी केला आहे. राहते घर कोसळून पडल्यावर व एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? एकतरी वर्षात आपलेही घरकुल योजनेत नाव येईल व आपलेही पक्के राहील हे स्वप्न घेऊन किसन मागील २५ वर्षापासून घरावर ताडपत्री टाकून राहत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व लाभार्थ्यांनी केला आहे.शौचालय योजनेचाही लाभ नाहीज्या लाभार्थ्यांकडे शौचालय नाही, अशा लाभार्थ्यांना प्रशासनाची कोणतीही योजना देण्यात येणार नाही म्हणून आदेश आहेत. भारत स्वच्छ अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांकडे शौचालय नाही, अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याकरिता १२ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र ही योजना सुद्धा किसन लाभार्थ्यांपासून कोसो दूर ठरली. शौचालय नाही. घर नाही, राशन दुकानातून कोणतेही अन्न धान्य मिळत नाही. प्रशासनाच्या योजना कुणासाठी आहेत हे या लाभार्थ्यांना पाहिल्यास कळत आहे.