शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

उच्च प्रतीच्या धानाला दरवाढीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:16 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची खरेदी जोरात सुरु असून उच्च प्रतीच्या धानाला भाववाढ मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे सध्या आधारभूत केंद्रावर निम्न प्रतीचा धानच शेतकरी विकत असल्याचे दिसत आहे. तर उच्च प्रतीचा धान मिळेल त्या भावात देश असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : निम्न धानाचा आधार

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची खरेदी जोरात सुरु असून उच्च प्रतीच्या धानाला भाववाढ मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे सध्या आधारभूत केंद्रावर निम्न प्रतीचा धानच शेतकरी विकत असल्याचे दिसत आहे. तर उच्च प्रतीचा धान मिळेल त्या भावात देश असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतीचा आणि निम्न प्रतीचा धान येथे पिकतो. परंतु दोन्ही धानाला अपेक्षित दरच मिळत नाही. पालांदूर येथे उच्च प्रतीच्या धानाला १९५० ते २१०० या दरात विकावे लागत आहे. एवढ्या अल्प दरात उच्च प्रतीचा धान विकणे शेतकºयांना परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकºयांना आर्थिक समस्येमुळे हा धान विकावा लागत आहे. आधारभूत केंद्रावर योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व्यापाºयांकडे धाव घेत आहेत. चौरास भागातील पवनी तालुक्यात लाखो टन उच्च प्रतीचा धान मिलिंगसाठी भातगिरणीत पडून आहे. नागपूरचा व्यापारी भावाच्या अनुषंगाने काय निर्देश देतो यावर मिलिंग केले जात असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात एचएमटी, केशर, जयश्रीराम आरपीएम या उच्च प्रतीचे धान पिकविले जाते. त्याला मोठी मागणी आहे. परंतु भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सध्या निम्न प्रतीचा धान शेतकरी आधारभूत केंद्रावर विकत आहे. त्याठिकाणी १७५० रुपये भाव मिळत आहे. या ठिकाणी शेतकरी गत काही दिवसांपासून धान विकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासोबतच धानाला बोनस जाहीर होण्याचीही प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना आहे. धान उत्पादक शेतकरी प्रभाकर कडूकार म्हणाले, धानाला भाव मिळाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.