शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

सात वर्षांपासून "त्या" कुटुंबाची घरकुलाची प्रतीक्षा संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:22 IST

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल ....

निराधार, भूमिहीन प्रकाश हलमारेची व्यथा : लोकप्रतीनिधी लक्ष देतील काय?लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल तर लोकप्रतिनिधी त्यासाठी जागरुक राहून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा असते. परंतु करडी गावात या अपेक्षेलाच मूठमाती दिली जात आहे. सात वर्षापासून प्रकाश हलमारे पडक्या घरात ताडपत्री टाकून झोपडीत वास्तव्य करीत असताना त्यांचे मास्टर यादीत नाव असतानाही घरकूल मिळाले नाही. आता, प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्य क्रमाने त्यांना लाभ देणे गरजेचे असताना त्यांचेवर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे, हा प्रश्न विचारला जात आहे.करडी येथील प्रकाश यशवंत हलमारे हा अत्यंत गरीबीत जीवन जगत आहे. त्याचेकडे शेती नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. मिळेल ते काम करून कुटूंबाचे भरण पोषण तो करीत आहे. मजुरीचे भरवश्यावर प्रपंच चालवित असताना मातीचे झोपडी वजा घर पावसाने कोसळले. भिंती पडल्या. त्यामुळे मागील ८ ते १० वर्षापासून तो ताडपत्रीच्या झोपडीत जीवन जगत आहे. मजुरीचे काम करणाऱ्या प्रकाशकडे ५ मुली असून चार मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगी पुन्हा लग्नाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत घर बांधण्याचे आर्थिक पाठबळ त्यांचेकडे नाही. तळहातावर रोज जगणाऱ्या प्रकाशला आधार फक्त पत्नीचा आहे. बायकोचे मिठ तर नवऱ्याचा पिठ, अशा अवस्थेत जीवन जगत असताना, सात वर्षाअगोदर त्याचे नाव ग्रामपंचायत मास्टर यादीत होते. गुणांकही कमी होते, परंतू गावातील जास्त गुणांक असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला. प्रकाशवर राजकीय भावनेतून सुड उगविला गेला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना घराचा लाभ दिला. स्वत:चे घर व गाईचे गोठे बांधण्यासाठी प्रशसनाला हादरवून सोडले. मात्र, प्रकाशला न्याय देण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. अनेकदा ग्रामपंचायतमध्ये प्रश्न लावून धरला असतानाही, घरकुल देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दया आली नाही.स्वत:चे घर नसल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत झाली आहे. पावसाळ्यात जीवन जगावे कसे, असा त्यांचा प्रश्न आहे. घरकुलाच्या प्रतिक्षेत सात वर्ष निघाल्यानतरही प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ मिळत नसेल तर आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी, श्रीमंताना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र, बेघर व निराधारांना घराचे हक्कापासून वंचित ठेवले जात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, निवासा अभावी हलमारे परिवार उघड्यावर जीवन जगत असताना न्याय द्यायचा कुणी, त्यामुळे प्रकाशला घरकुल देण्यासाठी आमदार व खासदार पुढाकार घेणार का, की निव्वळ निवडणुकात गरिबाच्या नावावर मत मागण्याचे राजकारण केले जाणार हा कळीचा मुद्दा आहे. हलमारे यांना न्याय देण्यासाठी खासदार व आमदार महोदयांनी पुढाकार घ्यावा, घरकूल तत्काळ मंजुर करावा, अशी मागणी प्रकाश हलमारे यांनी केली आहे.प्रकाश हलमारेवर अन्याय करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशसानाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र प्रकाशवर सुड उगविण्यात आला आहे. उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना घरकुल न देता श्रीमतांना लाभ दिला जात असल्याने त्या विरोधात धरणे आंदोलन केले जाईल. त्वरीत हलमारे यांना घरकुल देणे गरजेचे आहे.-ज्ञानेश्वर ढेंगे, सामाजिक कार्यकर्ता करडी.प्रशासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी मिळाली होती ती जशीच्या तशी पाठविण्यात आली. गरजुंना विचार करून प्राधान्यक्रम ठरविता येते याची माहिती प्रशासनाने त्यावेळी दिली नाही. त्यामुळे आता काहीही करता येणार नाही.-सिमा साठवणे, सरपंच करडी.