शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सात वर्षांपासून "त्या" कुटुंबाची घरकुलाची प्रतीक्षा संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:22 IST

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल ....

निराधार, भूमिहीन प्रकाश हलमारेची व्यथा : लोकप्रतीनिधी लक्ष देतील काय?लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल तर लोकप्रतिनिधी त्यासाठी जागरुक राहून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा असते. परंतु करडी गावात या अपेक्षेलाच मूठमाती दिली जात आहे. सात वर्षापासून प्रकाश हलमारे पडक्या घरात ताडपत्री टाकून झोपडीत वास्तव्य करीत असताना त्यांचे मास्टर यादीत नाव असतानाही घरकूल मिळाले नाही. आता, प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्य क्रमाने त्यांना लाभ देणे गरजेचे असताना त्यांचेवर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे, हा प्रश्न विचारला जात आहे.करडी येथील प्रकाश यशवंत हलमारे हा अत्यंत गरीबीत जीवन जगत आहे. त्याचेकडे शेती नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. मिळेल ते काम करून कुटूंबाचे भरण पोषण तो करीत आहे. मजुरीचे भरवश्यावर प्रपंच चालवित असताना मातीचे झोपडी वजा घर पावसाने कोसळले. भिंती पडल्या. त्यामुळे मागील ८ ते १० वर्षापासून तो ताडपत्रीच्या झोपडीत जीवन जगत आहे. मजुरीचे काम करणाऱ्या प्रकाशकडे ५ मुली असून चार मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगी पुन्हा लग्नाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत घर बांधण्याचे आर्थिक पाठबळ त्यांचेकडे नाही. तळहातावर रोज जगणाऱ्या प्रकाशला आधार फक्त पत्नीचा आहे. बायकोचे मिठ तर नवऱ्याचा पिठ, अशा अवस्थेत जीवन जगत असताना, सात वर्षाअगोदर त्याचे नाव ग्रामपंचायत मास्टर यादीत होते. गुणांकही कमी होते, परंतू गावातील जास्त गुणांक असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला. प्रकाशवर राजकीय भावनेतून सुड उगविला गेला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना घराचा लाभ दिला. स्वत:चे घर व गाईचे गोठे बांधण्यासाठी प्रशसनाला हादरवून सोडले. मात्र, प्रकाशला न्याय देण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. अनेकदा ग्रामपंचायतमध्ये प्रश्न लावून धरला असतानाही, घरकुल देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दया आली नाही.स्वत:चे घर नसल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत झाली आहे. पावसाळ्यात जीवन जगावे कसे, असा त्यांचा प्रश्न आहे. घरकुलाच्या प्रतिक्षेत सात वर्ष निघाल्यानतरही प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ मिळत नसेल तर आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी, श्रीमंताना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र, बेघर व निराधारांना घराचे हक्कापासून वंचित ठेवले जात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, निवासा अभावी हलमारे परिवार उघड्यावर जीवन जगत असताना न्याय द्यायचा कुणी, त्यामुळे प्रकाशला घरकुल देण्यासाठी आमदार व खासदार पुढाकार घेणार का, की निव्वळ निवडणुकात गरिबाच्या नावावर मत मागण्याचे राजकारण केले जाणार हा कळीचा मुद्दा आहे. हलमारे यांना न्याय देण्यासाठी खासदार व आमदार महोदयांनी पुढाकार घ्यावा, घरकूल तत्काळ मंजुर करावा, अशी मागणी प्रकाश हलमारे यांनी केली आहे.प्रकाश हलमारेवर अन्याय करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशसानाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र प्रकाशवर सुड उगविण्यात आला आहे. उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना घरकुल न देता श्रीमतांना लाभ दिला जात असल्याने त्या विरोधात धरणे आंदोलन केले जाईल. त्वरीत हलमारे यांना घरकुल देणे गरजेचे आहे.-ज्ञानेश्वर ढेंगे, सामाजिक कार्यकर्ता करडी.प्रशासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी मिळाली होती ती जशीच्या तशी पाठविण्यात आली. गरजुंना विचार करून प्राधान्यक्रम ठरविता येते याची माहिती प्रशासनाने त्यावेळी दिली नाही. त्यामुळे आता काहीही करता येणार नाही.-सिमा साठवणे, सरपंच करडी.