शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाला विकासाची प्रतीक्षा

By admin | Updated: September 2, 2015 00:24 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या अजूनही 'जैसे थे' असून याला स्थानिक राजकारण जबाबदार ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

तुमसर : तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या अजूनही 'जैसे थे' असून याला स्थानिक राजकारण जबाबदार ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. परिणामी ग्रामीण भागाला अद्याप विकासाची प्रतीक्षाच आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र याच समस्यांवर राजकारण करण्यातच ही मंडळी धन्यता मानते. गावातील समस्या सोडविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. गावातील समस्यांची पूर्तत: करण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवित आहे. मात्र 'कमिशन' बाजीमुळे कामाची गुणवत्ता कमालीची खालावत आहे.गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत 'तेरी भी चूप मेरी भी चूप', असे वागत आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास करण्यासाठी काही समित्याही गठित करण्यात आल्या. मात्र त्या नाममात्रच आहे. या समित्यांमध्ये पराभूत उमेदवाराची सोय करण्यासाठी तसेच आपल्या हितशत्रूला एखाद्या समितीत पद घेऊन खुश करण्यापुरतीच समिती मर्यादित राहिली आहे. ७३ व्या घटनादुरूस्तीने ग्रामपंचायतींना भक्कम असे अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे सरपंचपदी बसणारी व्यक्ती प्रभावशाली झाली आहे. ग्रामस्थांची त्यांना किती कळकळ आहे, यावरून विकासाची दिशा ठरते. तथापि ग्रामीण भागात अतिक्रमण वाढत आहे. त्यातून कलह होतात. नाल्यातील गाळ साफ करण्यासाठी ग्रामपंचायत खर्च करते. तरीही थातुरमातूर गाळ साफ केला जातो. अनेक गावांत स्नानगृहाचे पाणी रस्त्यावर येऊन त्याचा त्रास इतरांना होतो. सांडपाण्याच्या नालीतील दुर्गंधीमुळे डासांचे प्रमाण वाढते. त्यावर पूर्वीसारखे डी.डी.टी. पावडरची फवारणी आता होत नाही. (तालुका प्रतिनिधी) ग्रामीण भागात अशुद्ध पाणी पुरवठानागरिकांना अशुद्ध व फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी ग्रामस्थांना हाडांचे आजार बळावत आहे. खेडेभागात तर विजेची मोठी समस्या आहे. कधी कमी विद्युत दाब, तर कधी वीज खंडित होणे, कधी-कधी दिवसभरही खांबावरील दिवे सुरू असतात. याकडे कुणाचेही लक्ष नाही. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतींना विसर पडलेला दिसतो. त्यात लोकांचीही उदासीनता, गटातटाचे राजकारण, कमालीचे वैमनस्य, सत्तेचे अर्थकारण यात ग्रामीण राजकारण अडकलेले दिसते. अजूनही ग्रामीण शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व्यवस्थित पांदण रस्ते नाही. या विकासासाठी लोकसहभागाचीही गरज आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.