शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहू

By admin | Updated: July 3, 2016 00:27 IST

विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे.

विदर्भ राज्य आघाडीची सभा : नीरज खांदेवाले यांचा इशाराभंडारा : विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे. आमचा हिंसक आंदोलनावर विश्वास नाही. कारण ही संतांची भूमी आहे. अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. परंतु प्रसंगी जनता रस्त्यावरही उतरू शकते. याची जाणीव सरकारने ठेवावी. तसेच सरकारने आमचे आंदोलन हिंसक होण्याची वाट न पाहता स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असा सूचक इशारा विदर्भ राज्य आघाडीचे सचिव अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांनी दिला.विदर्भ राज्य आघाडी, भंडारा जिल्हातर्फे सार्वजनिक वाचनालय, येथे आयोजित स्वतंत्र विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, १ मे २०१५ रोजी या आघाडीची स्थापना अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.प्रा. अनिल जवादे म्हणाले, जनतेला संविधानीक अधिकार बहाल करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. परंतू आजपर्यंत सत्तेतील नेत्यांनी तसे होऊ दिले नाही. कारण त्यांना दर पाच वर्षांनी जनतेकडून मतांची भीक मागावी लागते आणि मतदार मताचे त्यांना दान करते हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी आपला अधिकार आणि आपल्या मताची किंमत व महत्व जनतेने समजून घेतले पाहिजे. शेतकरी नेते श्रीकांत तराळ म्हणाले, विदर्भाची मागणी जुनी असली तरी आजची परिस्थिती वेगळी आहे. सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भातील मामा तलावाच्य विकासाकरीता एकही पैसा खर्च केला नाही. परिणामी येथील शेती बिनभरोशाची झाली. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. श्रीहरी अणे यांचे हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे सरकार तसेच राजकारण्यांमध्ये त्यांच्या नावाची धडकी भरली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते त्याविषयी सजग राहणे गरजेचे आहे. सरकारने राजकारणासाठी जनतेला वापरू नये तर राजकाण जनतेच्या हितासाठी करावे. सभेचे संयोजक रमाकांत पशिने यांनी तर संचालन केशव हुड यांनी केले. आभार अ‍ॅड. जयेश बोरकर यांनी मानले. यावेळी विदर्भ राज्यावरील स्वलिखित कविता कवी मार्कंड नंदेश्वर यांनी वाचले. जाहीर सभेसाठी अविनाश पनके, सुनिल जोशी, अ‍ॅड. अनंत गुप्ते, शशांक जोशी, भुमीपुत्र देवदास गभणे, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी रमेश व्यवहारे, मार्कंड नंदेश्वर, अ‍ॅड. मधुकर वडेटवार, अरविंद ढोमणे, स.वा. मोहतुरे, रामदास महाकाळकर, रमेश तलदार, मधुबाला पशिने, मंजुषा बुरडे, गायत्री पंचबुद्धे, अनिता बोरकर, प्रितल बांते, धनराज सावठणे, विजय घोडमारे, शरद साकुरे, नरेंंद्र कटकवार, राहूल बडोले, खैरातीलाल, विजयकुमार दुबे, भा.श. जोगेकर, अशोक निमकर, गणेश धांडे, अ‍ॅड. सतीश ठवकर, प्रमोद काटेखाये, इंद्रकुमार राही, रमेश ढोमणे, विजय बडगुजर, साकोली येथील पदाधिकारी राकेश भास्कर, प्रविण भांडारकर, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, चंद्रकांत वडीचार, प्रविण डोंगरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)