शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या

By admin | Updated: March 5, 2017 00:35 IST

यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता....

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी : मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमाची परिस्थिती भंडारा : यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्स (मतपत्रिका) द्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हाध्यक्ष दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी यांनी केली आहे.मागील वर्षात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकांचे निकाल नागरिक आणि मतदारांतील असंतोष पाहता जे उमेदवार निवडून येण्याची १०१ टक्के खात्री होती ते उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकल्या जाऊन पराभूत झाले. यामुळे निश्चितपणे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बदल करून घोळ करण्यात आला असल्याच्या शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका नि:पक्षपाती व्हाव्यात, या भावनेतून मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करीत असतात पण वरील निवडणुकांचे निकाल मतदार नागरिकांच्या मनात असंतोष पसरविणारे आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढण्यात आलीत व आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याद्वारे ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सुधारणा करणे काळाची गरज आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा त्यांच्यापहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानाला विरोध दर्शवून बॅलेट पेपर्स द्वारे मतदान घ्यावे अशी सूचना केल्यानंतर अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घेण्यात आले होते. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाने मतदार नागरिकांच्या भावनांचा आदर करून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी बी.आर.एस.पी. चे नेते संजय गाढवे, झेड.आर. दुधकुवर, मनोज गोस्वामी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)