शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

हिंसा वा लबाडीने प्रश्न सुटत नाही!

By admin | Updated: December 31, 2016 01:45 IST

हिंसा, चोरी, लबाडी इत्यादी मार्गाने क्षणभर जीवनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. परंतु ते सुटत नसतात.

 एस. जे. भट्टाचार्य : कारागृहात गांधी विचार परीक्षा भंडारा : हिंसा, चोरी, लबाडी इत्यादी मार्गाने क्षणभर जीवनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. परंतु ते सुटत नसतात. तो चुकीचा मार्ग ठरतो. सत्याचा मार्ग हाच खरा मार्ग आहे. गांधी चरित्रापासून हाच बोध आपण घेऊ शकतो. याच सत्याच्या मार्गाने मोहनदास महात्मा झाला, भंडाऱ्याचे अतिरिक्त न्याय दंडाधिकारी एस.जे. भट्टाचार्य यांनी समर्पक उदाहरणे देत, जिल्हा कारागृहात बंदीसोबत संवाद साधत होते. निमित्त होते, गांधी विचार मंच भंडारा, सर्वोदय मंडळ मुंबई आणि जिल्हा कारागृह भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीसाठी गांधी विचार परीक्षेचे. यावेळी उद्योजक रामविलास सारडा उपस्थित होते. या परीक्षेत आयोजित ६१ बंदीना त्यांच्या सहभागाबद्दल अतिरिक्त न्याय दंडाधिकारी एस.जे. भट्टाचार्य, रामविलास सारडा, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, तुरुंग अधिकारी रमेश मेंगरे यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी भट्टाचार्य म्हणाले, बंधूनो कारागृहात येण्याची पुन: चूक करू नका. चांगली कामे करून समाजात मानाची जागा स्वत:करिता निर्माण करा. स्वत:ला कमी लेखू नका. नकारार्थी विचार सोडा, हिंसा, लबाडी, मारामारी हे सारे नकारार्थी विचारातून घडतात. चांगल्या लोकांचे अनुकरण करा त्यामुळे तुमचे आचार विचार बदलतील. तुमच्या कुटुंबावर त्यांचा सकारात्मक परिणाम होईल. परिवर्तनाचा प्रारंभ आतापासूनच करा. वेळ दवडू नका, असे आवाहन केले. संचालन गांधी विचार मंचचे अध्यक्ष प्रा.वामन तुरिले यांनी तर आभार प्रदर्शन कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)प्राविण्याचे मानकरी प्रथम परीक्षा (वर्ग ५ ते ७) प्रथम शिवशंकर नारायण शेंडे, द्वितीय एकनाथ योगीराज देशभ्रतार, द्वितीय परीक्षा (वर्ग ८ ते १०) प्रथम क्रमांक शिवशंकर रवाकचंद साखरवाडे, द्वितीय हेमकृष्ण गोंगलजी सिंदीमेश्राम, तृतीय परीक्षा (वर्ग ११ ते पदव्युत्तर) प्रथम भानूदास रामकृष्ण मुनेश्वर द्वितीय प्रल्हाद तानबाजी पवार यांचा क्रमांक लागला.याप्रसंगी गांधी चरित्र व विचारांवर, विचार मांडल्याबद्दल बंदी, जीवन, सोपान दास यांना बक्षिस देण्यात आले.