शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: February 12, 2017 00:22 IST

गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, ...

अनिता तेलंग : ग्रामपंचायतीने घेतला पुढाकारअड्याळ : गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले. महिला व समाजकल्याण तसेच ग्रामस्वच्छता अभियान यासाठी ग्रामपंचायत अड्याळने पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन गुजरी चौक येथे केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी खंड विकास अधिकारी, ठाणेदार अजाबराव नेवारे, सरपंच रजनी धारणे, उपसरपंच देवीदास नगरे, ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तेलंग यांनी, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सोबत ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय व्हावे यासाठी शासनाकडून मदतही मिळत आहे. कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचे असल्यास त्यासाठी घरात शौचालय असणे महत्वाचे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने ज्यांच्या घरी जनावरांची संख्या जास्त आहे अशांनी बायोगॅसचा वापर करावा, असे मार्गदर्शन तेलंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता. (वार्ताहर)