शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानासाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST

पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे.

आलेसूर येथील उपक्रम : वाघमारे यांचाही सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून जनतेच्या श्रमदानातून जलसंवर्धनाचे भरीव केले जात असून याला लोकचवळीचे स्वरुप आले असल्याने सर्वांनी एकत्र येवून श्रमदानातून जलसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी आलेसूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्र. ४० मधील वन तालावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य संदीप ताले, पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सरपंच गोपिका मेहर, उपसरपंच संजय इळपाचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल मडावी, ग्रा.पं. सदस्य खुशाल राऊत, नंदलाल खंडाते, वनक्षेत्र सहाय्यक श्रीराम केकान, ग्रामसेवक भारत जिभकाटे, रामचंद्र राऊत, दुर्गाप्रसाद भट, अशोक वाढीवे, निलेश श्रीरंग, वनसमिती अध्यक्ष नारायण पारधी, राजेश चौधरी, निलकमल पारधी, आशा वाघाडे, बबिता सलामे, स्वा.करमरकर, प्रकाश कोहळे, ओम करमरकर, हेमराज मेहर, बालचंद सोनवाने, भीवाराम मेहर, मंगला आहाके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान करून ट्रॅक्टरमध्ये गाळ फेकण्याचे काम केले. या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाण्याच्या संचयास वाढ होईल व शिवारात गाळ टाकल्यामुळे शेतातील पिक जोमदार येतील. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होवून फायदा होईल. वनतलावात पाणी साचल्याने वनप्राण्यांना पाण्याची दीर्घकाळ सोय होवून वनप्राण्याचे त्यामुळे संवर्धनही करण्यात मदत मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक दायीत्व पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे असे आ.चरण वाघमारे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावातील महिला व पुरुष तसनवर्ग विविध मंडळानी सक्रीय सहभाग घेत ४१० गावकरी व वनतलावातील सर्व कर्मचारी यांनी वनतलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा अभिनव उपक्रम राबविल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.