शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

श्रमदानासाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST

पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे.

आलेसूर येथील उपक्रम : वाघमारे यांचाही सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून जनतेच्या श्रमदानातून जलसंवर्धनाचे भरीव केले जात असून याला लोकचवळीचे स्वरुप आले असल्याने सर्वांनी एकत्र येवून श्रमदानातून जलसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी आलेसूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्र. ४० मधील वन तालावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य संदीप ताले, पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सरपंच गोपिका मेहर, उपसरपंच संजय इळपाचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल मडावी, ग्रा.पं. सदस्य खुशाल राऊत, नंदलाल खंडाते, वनक्षेत्र सहाय्यक श्रीराम केकान, ग्रामसेवक भारत जिभकाटे, रामचंद्र राऊत, दुर्गाप्रसाद भट, अशोक वाढीवे, निलेश श्रीरंग, वनसमिती अध्यक्ष नारायण पारधी, राजेश चौधरी, निलकमल पारधी, आशा वाघाडे, बबिता सलामे, स्वा.करमरकर, प्रकाश कोहळे, ओम करमरकर, हेमराज मेहर, बालचंद सोनवाने, भीवाराम मेहर, मंगला आहाके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान करून ट्रॅक्टरमध्ये गाळ फेकण्याचे काम केले. या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाण्याच्या संचयास वाढ होईल व शिवारात गाळ टाकल्यामुळे शेतातील पिक जोमदार येतील. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होवून फायदा होईल. वनतलावात पाणी साचल्याने वनप्राण्यांना पाण्याची दीर्घकाळ सोय होवून वनप्राण्याचे त्यामुळे संवर्धनही करण्यात मदत मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक दायीत्व पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे असे आ.चरण वाघमारे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावातील महिला व पुरुष तसनवर्ग विविध मंडळानी सक्रीय सहभाग घेत ४१० गावकरी व वनतलावातील सर्व कर्मचारी यांनी वनतलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा अभिनव उपक्रम राबविल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.