शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रेती माफियांविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:59 IST

मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती. महसूल विभाग व रेती माफिया यांच्या अंतर्गत सोटेलोटे असल्याने कारवाई होत नव्हती. कारवाई होत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी आज सकाळपासून एल्गार आंदोलन पुकारले.सरपंच आनंद मलेवार यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी नदी पात्रात जाऊन आंदोलन केले. सादर आंदोलन तब्बल ८ तास सुरु होते. तहसीलदार मोहाडी यांच्या आश्वसनानंतर तूर्तास आंदोलन माघे घेण्यात आले. पण कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.तालुक्यातील नेरी हे गाव सूर नदीच्या काठावर वसलेले आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यामुळे नदी पात्र लगत असलेल्या शेकडो एकर शेतातील पिकावर लोकांचे जीवन अवलंबून आहे. पण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबद सहा महिन्यापासून कागदोपत्री व्यवहार करूनही त्यांनी कारवाई एली नाही. यावर गावकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कारवाई न झाल्याने गावक?्यांनी स्वत:च एल्गार पुकारून आंदोलन करण्याचा निर्धार करून सदर माहिती महसूल विभागाला देण्यात आली. पण रेती उत्खनन थांबले नाही. म्हणून आज सकाळी सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, शोभाराम तिजारे यांच्यासह ५०० च्यावर महिला पुरुषांनी नदीपात्रात आंदोलन केले.ग्रामस्थ तूर्तास शांत, पण भूमिकेवर ठामआंदोलन होणार असल्याने सकाळपासून वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. बी ताजने . उपनिरीक्षक विवेक राऊत यांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार घटना स्थळावर आल्याशिवाय हलणार नाही संकल्प ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळावर यायला तयार नसलेल्या तहसीलदारांना अखेर घटनास्थळावर येणे भाग पडले. रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षेत तलाठी काही लोकांची समिती बनवून नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. यासाठी पोलीस विभागाला पत्र देऊन रीतसर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितल्यावर आंदोलन तूर्तास शांत झाले. पण कारवाई न होऊन रेती चोरी न थांबल्यास पुन: आंदोलन करू या भूमिकेवर गावकरी ठाम होते.

टॅग्स :sandवाळू