शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

रेती माफियांविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:59 IST

मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती. महसूल विभाग व रेती माफिया यांच्या अंतर्गत सोटेलोटे असल्याने कारवाई होत नव्हती. कारवाई होत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी आज सकाळपासून एल्गार आंदोलन पुकारले.सरपंच आनंद मलेवार यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी नदी पात्रात जाऊन आंदोलन केले. सादर आंदोलन तब्बल ८ तास सुरु होते. तहसीलदार मोहाडी यांच्या आश्वसनानंतर तूर्तास आंदोलन माघे घेण्यात आले. पण कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.तालुक्यातील नेरी हे गाव सूर नदीच्या काठावर वसलेले आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यामुळे नदी पात्र लगत असलेल्या शेकडो एकर शेतातील पिकावर लोकांचे जीवन अवलंबून आहे. पण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबद सहा महिन्यापासून कागदोपत्री व्यवहार करूनही त्यांनी कारवाई एली नाही. यावर गावकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कारवाई न झाल्याने गावक?्यांनी स्वत:च एल्गार पुकारून आंदोलन करण्याचा निर्धार करून सदर माहिती महसूल विभागाला देण्यात आली. पण रेती उत्खनन थांबले नाही. म्हणून आज सकाळी सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, शोभाराम तिजारे यांच्यासह ५०० च्यावर महिला पुरुषांनी नदीपात्रात आंदोलन केले.ग्रामस्थ तूर्तास शांत, पण भूमिकेवर ठामआंदोलन होणार असल्याने सकाळपासून वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. बी ताजने . उपनिरीक्षक विवेक राऊत यांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार घटना स्थळावर आल्याशिवाय हलणार नाही संकल्प ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळावर यायला तयार नसलेल्या तहसीलदारांना अखेर घटनास्थळावर येणे भाग पडले. रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षेत तलाठी काही लोकांची समिती बनवून नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. यासाठी पोलीस विभागाला पत्र देऊन रीतसर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितल्यावर आंदोलन तूर्तास शांत झाले. पण कारवाई न होऊन रेती चोरी न थांबल्यास पुन: आंदोलन करू या भूमिकेवर गावकरी ठाम होते.

टॅग्स :sandवाळू