शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:37 IST

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित ...

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बोलावुन विशेष आमसभा भरविण्यात आली. या सभेतच शेकडो ग्रामस्थांच्या समक्ष डी.एस. इंगळे तथा वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत (लाखनी), बि. एल. राऊत या तिन्ही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिले.अड्याळ जवळील तिर्री माडगी, पुरकाबोडी, किटाळी, भिमसेन टेकडी परिसरातील हजारो हेक्टरमध्ये घनदाट जंगल होते. वनविकास महामंडळाने मागील तीन ते चार वर्षापासुन येथील शेकडो प्रकारच्या लहान मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली. याचा दुष्पपरिणाम म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची वाटचाल आता जंगल शेजारील गावात पाहायला मिळते. तिर्री ग्रामवासीयांनी लोकप्रतिनिधी तथा वनमंत्री व संबंधित विभागाला गेली दोन वर्षात अनेक पत्रे दिली. परंतु या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आलीे. पवनी तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असणारे गाव म्हणजे तिर्री. ग्रामस्थांनी अनेकदा या आधीही अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. वनविकास महामंडळ हे खरच जंगलाचा विकास करत आहेत की ऱ्हास? असा प्रश्न नागरिकच विचारीत आहे. वनविकास महामंडळाची जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे तिथे आजपावेतो सर्वात जास्त प्रमाणात सागवन वृक्ष लावण्यात आली. परंतू वृक्ष तोडमुळे उन्हाच्या दिवसात सावली मिळत नाही. पक्षांना खाद्य मिळत नाही. याच मनमानी कारभारामुळे व काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीला तिर्री ग्रामवासीयांनी चांगलाच धडा शिकविला.तोडलेल्या २० हेक्टर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल तेव्हा तिर्री ग्रामवासी श्रमदान करतील. परंतु या ठिकाणी केवळ सागवण वृक्ष लावण्यात आले तर लावलेले वृक्षही ग्रामस्थच काढणार, असे मत ज्यावेळी माजी उपसरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी मांडले. त्यावेळी सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु वेळेवर वनविकास महामंडळाने लक्ष दिले नाही.‘मॅडम’ मराठीत बोलाआमसभेत चर्चेच्या वेळी वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत या इंग्रजीत बोलत होत्या. ग्रामस्थांना इंग्रजीे समजत नसल्याने येथे उपस्थित एका बालकाने ‘मॅडम’ मराठीत बोला, असे म्हणताच एकच हशा पिकला.