शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:37 IST

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित ...

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बोलावुन विशेष आमसभा भरविण्यात आली. या सभेतच शेकडो ग्रामस्थांच्या समक्ष डी.एस. इंगळे तथा वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत (लाखनी), बि. एल. राऊत या तिन्ही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिले.अड्याळ जवळील तिर्री माडगी, पुरकाबोडी, किटाळी, भिमसेन टेकडी परिसरातील हजारो हेक्टरमध्ये घनदाट जंगल होते. वनविकास महामंडळाने मागील तीन ते चार वर्षापासुन येथील शेकडो प्रकारच्या लहान मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली. याचा दुष्पपरिणाम म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची वाटचाल आता जंगल शेजारील गावात पाहायला मिळते. तिर्री ग्रामवासीयांनी लोकप्रतिनिधी तथा वनमंत्री व संबंधित विभागाला गेली दोन वर्षात अनेक पत्रे दिली. परंतु या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आलीे. पवनी तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असणारे गाव म्हणजे तिर्री. ग्रामस्थांनी अनेकदा या आधीही अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. वनविकास महामंडळ हे खरच जंगलाचा विकास करत आहेत की ऱ्हास? असा प्रश्न नागरिकच विचारीत आहे. वनविकास महामंडळाची जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे तिथे आजपावेतो सर्वात जास्त प्रमाणात सागवन वृक्ष लावण्यात आली. परंतू वृक्ष तोडमुळे उन्हाच्या दिवसात सावली मिळत नाही. पक्षांना खाद्य मिळत नाही. याच मनमानी कारभारामुळे व काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीला तिर्री ग्रामवासीयांनी चांगलाच धडा शिकविला.तोडलेल्या २० हेक्टर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल तेव्हा तिर्री ग्रामवासी श्रमदान करतील. परंतु या ठिकाणी केवळ सागवण वृक्ष लावण्यात आले तर लावलेले वृक्षही ग्रामस्थच काढणार, असे मत ज्यावेळी माजी उपसरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी मांडले. त्यावेळी सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु वेळेवर वनविकास महामंडळाने लक्ष दिले नाही.‘मॅडम’ मराठीत बोलाआमसभेत चर्चेच्या वेळी वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत या इंग्रजीत बोलत होत्या. ग्रामस्थांना इंग्रजीे समजत नसल्याने येथे उपस्थित एका बालकाने ‘मॅडम’ मराठीत बोला, असे म्हणताच एकच हशा पिकला.