शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:37 IST

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित ...

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोपविशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बोलावुन विशेष आमसभा भरविण्यात आली. या सभेतच शेकडो ग्रामस्थांच्या समक्ष डी.एस. इंगळे तथा वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत (लाखनी), बि. एल. राऊत या तिन्ही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिले.अड्याळ जवळील तिर्री माडगी, पुरकाबोडी, किटाळी, भिमसेन टेकडी परिसरातील हजारो हेक्टरमध्ये घनदाट जंगल होते. वनविकास महामंडळाने मागील तीन ते चार वर्षापासुन येथील शेकडो प्रकारच्या लहान मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली. याचा दुष्पपरिणाम म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची वाटचाल आता जंगल शेजारील गावात पाहायला मिळते. तिर्री ग्रामवासीयांनी लोकप्रतिनिधी तथा वनमंत्री व संबंधित विभागाला गेली दोन वर्षात अनेक पत्रे दिली. परंतु या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आलीे. पवनी तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असणारे गाव म्हणजे तिर्री. ग्रामस्थांनी अनेकदा या आधीही अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. वनविकास महामंडळ हे खरच जंगलाचा विकास करत आहेत की ऱ्हास? असा प्रश्न नागरिकच विचारीत आहे. वनविकास महामंडळाची जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे तिथे आजपावेतो सर्वात जास्त प्रमाणात सागवन वृक्ष लावण्यात आली. परंतू वृक्ष तोडमुळे उन्हाच्या दिवसात सावली मिळत नाही. पक्षांना खाद्य मिळत नाही. याच मनमानी कारभारामुळे व काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीला तिर्री ग्रामवासीयांनी चांगलाच धडा शिकविला.तोडलेल्या २० हेक्टर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल तेव्हा तिर्री ग्रामवासी श्रमदान करतील. परंतु या ठिकाणी केवळ सागवण वृक्ष लावण्यात आले तर लावलेले वृक्षही ग्रामस्थच काढणार, असे मत ज्यावेळी माजी उपसरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी मांडले. त्यावेळी सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु वेळेवर वनविकास महामंडळाने लक्ष दिले नाही.‘मॅडम’ मराठीत बोलाआमसभेत चर्चेच्या वेळी वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत या इंग्रजीत बोलत होत्या. ग्रामस्थांना इंग्रजीे समजत नसल्याने येथे उपस्थित एका बालकाने ‘मॅडम’ मराठीत बोला, असे म्हणताच एकच हशा पिकला.