शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

गावपातळीवर क्वारंटाईन कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बरेचशे नागरिक अन्य जिल्ह्यातून गावपातळीवरही दाखल झाले आहेत. अशा लोकांची चाचपणी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात गावपातळीवरही व्यवस्था होणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरावर नर्सिंग व संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सुविधा आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सरपंचाच्या नेतृत्वात गठित होणार समिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मुंबई, पुणे व अन्य राज्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही अशा लोकांचे वास्तव्य आहे. परिणामी जिल्हापातळीवरच या सर्वांची व्यवस्था होणे शक्य नसल्याने गाव पातळीवरही क्वारंटाईन कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बरेचशे नागरिक अन्य जिल्ह्यातून गावपातळीवरही दाखल झाले आहेत. अशा लोकांची चाचपणी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात गावपातळीवरही व्यवस्था होणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरावर नर्सिंग व संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सुविधा आहे. मात्र त्यात संख्येपेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन केले जाऊ शकत नाही.अशावेळी ज्या गावात नागरिक बाहेरून आले अशांची त्याच गावात व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्याचा मानस असून गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व अन्य प्रमुख लोकांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यांच्याच नेतृत्वात क्वारंटाईन कक्षाचे कामकाज व देखरेख ठेवली जाणार आहे. याला स्थानिक प्रशासनासह तालुका व जिल्हा प्रशासनाचीही मदत मिळणार आहे.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी भंडारा शहरातील सर्व नर्सिंग होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या संस्थांची पाहणी केली.तसेच जिल्हा सीमेवर जाऊन चौकशी केली. क्वारंटाईन कक्षात रुग्णांना सुविधा योग्य मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी स्वत: याबाबत शहानिशा केल्याचे याबाबत समजते.शक्यतोवर शाळांची निवडगावपातळीवर क्वारंटाईन कक्ष शाळेमध्ये किंवा सुविधा असलेल्या सार्वजनिक स्थळी स्थापन करण्याचे सूचविण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारंटाईन कक्ष उभारण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. एकाच गावात जास्त व्यक्ती परजिल्ह्यातून किंवा अन्य राज्यातून आले असतील तर अशा गावात एकापेक्षा जास्त क्वारंटाईन कक्ष तयार करण्यावरही विचार केला जातो.अशी राहणार समितीगावस्तरावर क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात येऊन त्यात समितीचेही गठण करण्यात येत आहे. त्यात गावातील सरपंच, उपसरपंच, त्या शाळेचे मुख्याध्यापक, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे. यात शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण केलेल्या व्यक्तींची नोंद अद्ययावत ठेवणे, नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून संबंधितांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, शाळेचा परिसर व खोल्यांचे रोज निर्जंतूकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला बंधनकारक करणे आदी जबाबदारी राहणार आहे. तसेच शहर पातळीवर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी जबाबदार राहणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या