शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

स्थलांतरामुळे गावांच्या विकास निधीला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

जिल्ह्यातील हजारो मजूर कामासाठी नागपूर, मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. अनेकजण शहरातच कायमस्वरूपी स्थायिक होतात. त्यामुळे गावांच्या ...

जिल्ह्यातील हजारो मजूर कामासाठी नागपूर, मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. अनेकजण शहरातच कायमस्वरूपी स्थायिक होतात. त्यामुळे गावांच्या लोकसंख्येमध्ये घट होत आहे. शासनाने ग्रामीण पातळीवर विकासकामासाठी चौदाव्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यास सुरुवात केली. आता ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगानुसार निधी देण्यात येत असून, लोकसंख्येचे निकष लावले जात आहे. पंधराव्या वित्त आयोगानुसार आता ग्रामपंचायतला ८० टक्के थेट निधी मिळतो, तर १० टक्के जिल्हा परिषद व १० टक्के निधी पंचायत समितीला मिळतो. यातच गावाचे क्षेत्रफळ मोठे असले तर ९० टक्के लोकसंख्येनुसार आणि १० टक्के निधी क्षेत्रफळानुसार दिला जातो. जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याने मिळत असलेल्या निधीला कात्री लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विकास कामे करताना निधीची अडचण येत आहे. छोट्या गावात मतदार कमी असल्याने राजकीय नेतेही फारसे लक्ष देत नाही. दुसरीकडे लोकसंख्या कमी असल्याने निधी कमी मिळतो. परिणामी छोटी गावे अधिकाधिक भकास होत आहे.

बॉक्स

शिक्षण व आरोग्यासाठी शहरात स्थायिक

- गत काही वर्षांपासून शिक्षण व आरोग्याच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात स्थायिक होत आहेत.

- तसेच शहरात रोजगाराच्या संधी असल्यानेही ग्रामीण भागातील अनेक जण शहरात स्थायिक व्हायला लागले आहेत.

- परिणामी गावाची लोकसंख्या कमी होत असून, नागरीकरण वाढत आहे.

तीन प्रकारे मिळतो निधी

- गावांच्या विकासासाठी तीन प्रकारे निधी मिळतो. पंधराव्या वित्त आयोगासोबतच जनसुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीही निधी देते.

- पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जिल्हा नियोजन समिती गावात विविध विकासकामे करण्यासाठी निधी देते.

- तसेच अनुसूचित जाती, जमाती वस्ती विकासासाठी निधी मिळतो.

कोट

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण भागात निधी देताना लोकसंख्येचा निकष आहे. लोकसंख्येनुसार निधी मिळत आहे. वित्त आयोगामार्फत देण्यात येणारा निधी ८० टक्के ग्रामपंचायतला थेट मिळत असून, १० टक्के जिल्हा परिषद तर १० टक्के पंचायत समितीला मिळतो.

- नुतन सावंत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भंडारा