शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरामुळे गावांच्या विकास निधीला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

जिल्ह्यातील हजारो मजूर कामासाठी नागपूर, मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. अनेकजण शहरातच कायमस्वरूपी स्थायिक होतात. त्यामुळे गावांच्या ...

जिल्ह्यातील हजारो मजूर कामासाठी नागपूर, मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. अनेकजण शहरातच कायमस्वरूपी स्थायिक होतात. त्यामुळे गावांच्या लोकसंख्येमध्ये घट होत आहे. शासनाने ग्रामीण पातळीवर विकासकामासाठी चौदाव्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यास सुरुवात केली. आता ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगानुसार निधी देण्यात येत असून, लोकसंख्येचे निकष लावले जात आहे. पंधराव्या वित्त आयोगानुसार आता ग्रामपंचायतला ८० टक्के थेट निधी मिळतो, तर १० टक्के जिल्हा परिषद व १० टक्के निधी पंचायत समितीला मिळतो. यातच गावाचे क्षेत्रफळ मोठे असले तर ९० टक्के लोकसंख्येनुसार आणि १० टक्के निधी क्षेत्रफळानुसार दिला जातो. जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याने मिळत असलेल्या निधीला कात्री लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विकास कामे करताना निधीची अडचण येत आहे. छोट्या गावात मतदार कमी असल्याने राजकीय नेतेही फारसे लक्ष देत नाही. दुसरीकडे लोकसंख्या कमी असल्याने निधी कमी मिळतो. परिणामी छोटी गावे अधिकाधिक भकास होत आहे.

बॉक्स

शिक्षण व आरोग्यासाठी शहरात स्थायिक

- गत काही वर्षांपासून शिक्षण व आरोग्याच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात स्थायिक होत आहेत.

- तसेच शहरात रोजगाराच्या संधी असल्यानेही ग्रामीण भागातील अनेक जण शहरात स्थायिक व्हायला लागले आहेत.

- परिणामी गावाची लोकसंख्या कमी होत असून, नागरीकरण वाढत आहे.

तीन प्रकारे मिळतो निधी

- गावांच्या विकासासाठी तीन प्रकारे निधी मिळतो. पंधराव्या वित्त आयोगासोबतच जनसुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीही निधी देते.

- पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जिल्हा नियोजन समिती गावात विविध विकासकामे करण्यासाठी निधी देते.

- तसेच अनुसूचित जाती, जमाती वस्ती विकासासाठी निधी मिळतो.

कोट

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण भागात निधी देताना लोकसंख्येचा निकष आहे. लोकसंख्येनुसार निधी मिळत आहे. वित्त आयोगामार्फत देण्यात येणारा निधी ८० टक्के ग्रामपंचायतला थेट मिळत असून, १० टक्के जिल्हा परिषद तर १० टक्के पंचायत समितीला मिळतो.

- नुतन सावंत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भंडारा