शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ग्रामीणांची वर्दळ थांबली

By admin | Updated: November 9, 2016 00:40 IST

१९ नोव्हेंबरला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती,...

विधान परिषद निवडणूक : जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य पर्यटन वारीवरप्रशांत देसाई भंडारा१९ नोव्हेंबरला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर परिषद सदस्य व नगर पंचायत सदस्य पर्यटनवारीवर आहेत. मंगळवारला दुपारी जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता एकही पदाधिकारीही उपस्थित नसल्याचे आढळून आले. पदाधिकाऱ्या अनुपस्थितीमुळे कामे घेऊन आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागले. तर कामे घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ थांबल्याचे दिसून आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी अत्यंत चुरशीची होणारी विधान परिषदेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन, भाजपकडून डॉ. परिणय फुके तर काँग्रेसकडून प्रफुल अग्रवाल यांच्यात तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील काही पदाधिकारी दिवाळीपुर्वी तर काही पदाधिकारी दिवाळीनंतर पर्यटनवारीवर निघाले आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ग्रामीणांची नाळ जुडून असलेल्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य पर्यटनवारीवर आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचत आहे. अशातच अनेकांना ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने पळवाटा सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे.ग्रामीण जनतेची विविध कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतात. जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले सदस्य ग्रामीणांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत असतात. मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे येथील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषदेत आता एकही पदाधिकारी किंवा सदस्य दिसून येत नसल्याने कामासाठी आलेल्या ग्रामीण जनतेला आल्यापावली परतावे लागत आहे. सहा वर्षानंतर येत असलेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर सेवक व नगर पंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क असतो. सत्तेच्या सारीपाटात घोडेबाजारी सुरू असून मतदारांना ‘हायजॅक’ केले जात आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत पदाधिकारी दिसेनासे झाले आहेत. एरव्ही ग्रामीण भागातील नागरिकांनी गजबजून राहणारे जिल्हा परिषद आता पदाधिकारी व सदस्यांविना ओस पडलेली आहे. सदर प्रतिनिधीने आज दुपारी जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम हे आठवडभरापासून जिल्हा परिषदेत आले नसल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. या पदाधिकाऱ्यांची दालने नागरिकांच्या वर्दळीने नेहमी जशी गजबजून राहत होती. तशी गर्दी मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे नसल्याचे जाणवले. ही सर्व नेतेमंडळी पर्यटनासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांच्या कक्षात शुकशुकाट दिसून आला. ही परिस्थिती १९ नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसापर्यंत बघायला मिळणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक असला तरी या निवडणुकीमुळे पदाधिकारी व सदस्य भारतभ्रमणावर गेल्यामुळे जिल्हा परिषदेची सुत्रे आता अधिकारी हाताळत आहेत. पदाधिकाऱ्याअभावी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती मंदावली आहे.