शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नोकरभरतीवर आधी विदर्भातील बेरोजगारांचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:37 IST

मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला मिळविण्यासाठी विदर्भ गर्जनाने सुशिक्षित बेरोजगारांच्यावतीने एक उपक्रम हाती घेऊन शासनाविरूद्ध लढा पुकारला आहे.

ठळक मुद्देविदर्भ गर्जनेची मागणी : गावागावात समस्या समाधान शिबिर घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला मिळविण्यासाठी विदर्भ गर्जनाने सुशिक्षित बेरोजगारांच्यावतीने एक उपक्रम हाती घेऊन शासनाविरूद्ध लढा पुकारला आहे. याकरिता विदर्भ गर्जना युवकांची चळवळ उभारून महाविद्यालयीन तरूणांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे महत्त्व पटवून देणार आहे. मागील ६० वर्षांपासून विदर्भ उपेक्षित राहिला असल्याचे मत विदर्भ गर्जनाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले.विदर्भ वेगळा व्हावा ही प्रमुख मागणी असली तरी विदर्भ गर्जनाच्यावतीने विदर्भातील जनतेची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी याकरीता प्रयत्न करणार आहे, त्यासाठी कार्यकर्ता मेळावे, युवकांचे प्रशिक्षण शिबिरे, अभ्यास वर्ग आगामी काळात घेणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता सर्वस्तरावरील लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन त्यांचे समर्थन घेण्यात येणार आहे. हे अभियान पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. खासदार मधुकर कुकडे व माजी खासदार नाना पाटोले हे विदर्भ समर्थक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विदर्भाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या पक्षांनी विदर्भाच्या मागणीचे समर्थन करावे, अशी मागणी विदर्भ गर्जनाच्यावतीने करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे, असा धिंडोरा पिटला. परंतु परिस्थिती समाधानकारक नाही. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा शेतकरी हिताकरिता विदर्भ गर्जना रस्त्यावर उतरेल असा इशारा महेंद्र निंबार्ते यांनी दिला.स्थानिक समस्यांना घेऊन विदर्भ गर्जना ‘समस्यांचे समाधान’ या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन स्थानिक समस्या सोडविण्यात येतील त्याकरिता आंदोलनही करण्यात येईल. महाविद्यालयीन तरुणांना यात सहभागी करून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महेंद्र निंबार्ते, राकेश भास्कर, राजहंस मस्के, संतोष लांजेवार, अंकित बांते, अमित टिचकुले, पवनकुमार लाडे, कार्तिक डेकाटे, मिलिंद मेश्राम, श्रेयश टेंभूरकर, पंकज राऊत, संजय टिचकुले, राहुल मेश्राम, रजत गणवीर, राकेश लोथे, पंकज लाडे, अमित राऊत, कुलदीप शहारे, प्रशांत मेश्राम, निहार बुलबुले उपस्थित होते.