शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

विदर्भाचा उद्धार वेगळ्या विदर्भ राज्याशिवाय शक्य नाही

By admin | Updated: August 29, 2016 00:26 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना प्रमुख सहा आश्वासने देण्यात आली होती.

श्रीहरी अणे यांचे प्रतिपादन : पवनीत जाहीर सभा पवनी : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना प्रमुख सहा आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आश्वासने महाराष्ट्र सरकारने पाळले असले तरी लोकहिताचे प्रमुख तीन आश्वासने शासनकर्ते पाळू शकले नाही. विदर्भातून गठ्ठा मते घेवून गेलेले काँग्रेसने देशात आणि राज्यात राज्य केले. विकास मंडळ स्थापन केले. मात्र त्याने विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भवासीयांना आता विदर्भाच्या उद्धारासाठी वेगळा विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन राज्याचे माजी महाअधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी पवनी येथे जाहीर सभेत केले.स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य जनआंदोलन समितीच्या वतीने आयोजित जनजागृती जाहीर सभेत अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीविषयी बोलताना मी मराठी असलो तरी माझा विदर्भ देश आहे. मी विदर्भवासी आहे असे सांगून विदर्भ निर्मितीच्या वेळी राज्यकर्त्यांनी नागपूर करारानुसार दिलेले आश्वासन पाळलेले नाही. नागपुरला उपराजधानीचा दर्जा देणे, विधानसभेचे एक अधिवेशन देणे याशिवाय विदर्भाला काहीही दिले नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यावेळी २२ टक्के एवढा पैसाभ विदर्भाला द्यावयासह हवा होता. मात्र विदर्भाच्या वाट्याला अल्पशा निधी देवून पश्चिम महाराष्ट्राकडे विदर्भाचा पैसा चोरून नेऊन स्वत:चा विकास केला. रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा पुणे विभागाला पन्नास टक्के तर विदर्भाला केवळ अडीच टक्के नोकऱ्या देवून विदर्भवासीयांच्या तोंडाला पाने पुसले.विदर्भवासीयांची ओरड झाल्यानंतर दांडेकर समिती स्थापन करण्यात आली. अनुशेषाची माहिती घेण्यात आली. परंतु समितीच्या अहवालानुसार विदर्भाला निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे सिंचनाचा सुद्धा विकास झाला नाही. सिंचन नसल्यामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. त्या सुद्धा विदर्भाकरिताच आहेत.विदर्भ वेगळा करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. कारण त्यांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरावर जास्त प्रेम आहे. मुंबई सोडायची कोणाचीही तयारी नाही. त्यामुळे कोणताही पक्ष विदर्भ वेगळा करणार नाही. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे साकडे घातल्यास विदर्भ राज्य व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. असे झाले नाही तर विदर्भ राज्य जनआंदोलन समिती जनजागृती करून कायद्याने विदर्भ राज्य घेतल्याशिवाय राहणार नाही.याप्रसंगी आ.रामचंद्र अवसरे, विदर्भ राज्य आघाडीचे मुख्य संघटक नरेंद्र पालांदूरकर, कोषाध्यक्ष अ‍ॅड.सुरेंद्र पारधी, संविधानाचे अभ्यासक अनिल जवादे, डॉ.गोविंद कोडवाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव शिवरकर यांनी केले. संचालन अशोक पारधी यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल जिवनतारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजन समितीचे महादेव शिवरकर, सचिन हाडगे, सुनिल जिवनतारे, लक्ष्मीकांत तागडे, अशोक पारधी, अ‍ॅड.एकनाथ बावनकर, संदीप नंदरधने, धर्मदास भांबोरे, डॉ.राजेश नंदूरकर, गोपाल काटेखाये, आनंदराव वहाणे, किशोर राऊत, चिंतामण हेडावू, भास्कर उरकुडकर, किशोर पंचभाई, देवराज बावनकर, आशिष फुलबांधे, मनोज माळवी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)