शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचा विजय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:47 IST

अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : अंगणवाडी कर्मचाºयांच्या एकजुटीमुळेच मानधनवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सविता लुटे होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती नियंत्रक आयटक नेते दिलीप उटाणे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये उपस्थित होते. अवसरे यांनी हा विजय अंगणवाडी कर्मचाºयांच्या एकजुटीमुळेच माधनवाढ झाली आहे असे म्हणाले. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी मानधन वाढ झाल्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही. पुढच्या वर्षी अजून शासन मानधन वाढ करेल, याची मला खात्री आहे. २०१४ मध्ये मानधनवाढ दिली. अंगणवाडी कर्मचारी चांगले काम करतात याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. विरोधी पक्षात असताना बरेच वेळा विधानसभेत प्रश्न लावून धरले होते. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठींबा देणारे सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटना आदिचे यावेळी आभार मानण्यात आले. आभार प्रस्ताव संघटनेच्या जिल्हा सचिव अल्का बोरकर यांनी मांडला. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. तर प्रत्यक्ष संपात सहकारी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्याबाबत ६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधीसोबत सायंकाळी ५ वाजता बैठक घेऊन चर्चा केली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य करीत सेवाज्येष्ठता प्रमाणे मानधनवाढ, दरवर्षी पाच टक्के केल्याने वाढ, पोषण आहार रकमेत वाढ व इतर मागण्या मान्य केल्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतलामानधनवाढ सहजासहजी शासनाने दिली नसून अंगणवाडी कर्मचाºयांच्या २६ दिवस लढा देवून एकजुटीचा दर्शन शासनाला दाखविल्यामुळे मानधनात वाढ होऊ शकली असे प्रतिपादन आयटक नेते कॉ.दिलीप उटाणे यांनी करून अंगणवाडी कर्मचाºयांना कसा मानधन मिळेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत आशा कर्मचाºयांना शासन कुठलेही मानधन देत नाही. मात्र नवीन योजना आली की गावातील आशा या संप काढत सेविका व आशात भांडण लावण्याचे काम शासनाने केले. पोषण आहार वाटप करण्यासाठी आशांना कधी वैद्यकीय अधिकारी यांनी काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. मानसिक त्रास दिला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात काही आशांनी आहार वाटप केला. आशांबद्दल गैरसमज करू नये. त्याच प्रमाणे बचत गट, सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा अंगणवाडी कर्मचाºयांच्या विजयात मोठा वाटा आहे.शासनाने आशा कर्मचाºयांना मानधन देण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेने घ्यावा. अशी मागणी कॉ.दिलीप उटाणे यांनी केली. संघटना यासाठी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांकडे फाईल आहे. लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करावा म्हणून खासदार, आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देतील. आशांकडून अगदी वेठबिगारीचे काम करून घेतले जाते. यासाठी अंगणवाडी, आशा व गट प्रवर्तकांना केंद्र शासनाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी किमान वेतन देण्याची घोषणा केली तो आदेश अजूनपर्यंत निघालेला नाही. यासाठी ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे ‘संसद घेरो’चे आयोजन केले आहे. त्यात सहभागी व्हावे असेही आवाहन उटाणे यांनी केले.यावेळी कॉ.सदानंद इलमे, सुरेश अवसरे, रिता लोखंडे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये, उषा रणदिवे, कुंदा भदाडे, लहाना राजूरकर यांनी विचार मांडले. संचालन आशा रंगारी तर आभार मंगला गभणे यांनी मानले. अंगणवाडी विजय मेळाव्याला प्रचंड उपस्थिती होती अशी माहिती कार्याध्यक्ष कॉ.हिवराज उके यांनी दिली.