शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचा विजय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:47 IST

अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : अंगणवाडी कर्मचाºयांच्या एकजुटीमुळेच मानधनवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सविता लुटे होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती नियंत्रक आयटक नेते दिलीप उटाणे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये उपस्थित होते. अवसरे यांनी हा विजय अंगणवाडी कर्मचाºयांच्या एकजुटीमुळेच माधनवाढ झाली आहे असे म्हणाले. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी मानधन वाढ झाल्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही. पुढच्या वर्षी अजून शासन मानधन वाढ करेल, याची मला खात्री आहे. २०१४ मध्ये मानधनवाढ दिली. अंगणवाडी कर्मचारी चांगले काम करतात याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. विरोधी पक्षात असताना बरेच वेळा विधानसभेत प्रश्न लावून धरले होते. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठींबा देणारे सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटना आदिचे यावेळी आभार मानण्यात आले. आभार प्रस्ताव संघटनेच्या जिल्हा सचिव अल्का बोरकर यांनी मांडला. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. तर प्रत्यक्ष संपात सहकारी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्याबाबत ६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधीसोबत सायंकाळी ५ वाजता बैठक घेऊन चर्चा केली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य करीत सेवाज्येष्ठता प्रमाणे मानधनवाढ, दरवर्षी पाच टक्के केल्याने वाढ, पोषण आहार रकमेत वाढ व इतर मागण्या मान्य केल्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतलामानधनवाढ सहजासहजी शासनाने दिली नसून अंगणवाडी कर्मचाºयांच्या २६ दिवस लढा देवून एकजुटीचा दर्शन शासनाला दाखविल्यामुळे मानधनात वाढ होऊ शकली असे प्रतिपादन आयटक नेते कॉ.दिलीप उटाणे यांनी करून अंगणवाडी कर्मचाºयांना कसा मानधन मिळेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत आशा कर्मचाºयांना शासन कुठलेही मानधन देत नाही. मात्र नवीन योजना आली की गावातील आशा या संप काढत सेविका व आशात भांडण लावण्याचे काम शासनाने केले. पोषण आहार वाटप करण्यासाठी आशांना कधी वैद्यकीय अधिकारी यांनी काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. मानसिक त्रास दिला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात काही आशांनी आहार वाटप केला. आशांबद्दल गैरसमज करू नये. त्याच प्रमाणे बचत गट, सरपंच, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा अंगणवाडी कर्मचाºयांच्या विजयात मोठा वाटा आहे.शासनाने आशा कर्मचाºयांना मानधन देण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेने घ्यावा. अशी मागणी कॉ.दिलीप उटाणे यांनी केली. संघटना यासाठी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांकडे फाईल आहे. लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करावा म्हणून खासदार, आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देतील. आशांकडून अगदी वेठबिगारीचे काम करून घेतले जाते. यासाठी अंगणवाडी, आशा व गट प्रवर्तकांना केंद्र शासनाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी किमान वेतन देण्याची घोषणा केली तो आदेश अजूनपर्यंत निघालेला नाही. यासाठी ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे ‘संसद घेरो’चे आयोजन केले आहे. त्यात सहभागी व्हावे असेही आवाहन उटाणे यांनी केले.यावेळी कॉ.सदानंद इलमे, सुरेश अवसरे, रिता लोखंडे, गौतमी मंडपे, छाया क्षीरसागर, मंगला रामटेके, शमीम बानो, सुनंदा बडवाईक, लिलावती बडोले, छाया गजभिये, उषा रणदिवे, कुंदा भदाडे, लहाना राजूरकर यांनी विचार मांडले. संचालन आशा रंगारी तर आभार मंगला गभणे यांनी मानले. अंगणवाडी विजय मेळाव्याला प्रचंड उपस्थिती होती अशी माहिती कार्याध्यक्ष कॉ.हिवराज उके यांनी दिली.