शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा होरपळला

By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST

तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते.

शेतकरी हवालदिल : पहिल्या पावसानंतर किडीने मारले, बॅका कर्ज देईना-निसर्ग साथ देईनापवनी : तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते. धान, सोयाबीन व गहू ही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हरभरा व तूर या पिकांना सिंचन असलेल्या जमिनीचा वापर केला जातो. परंतु तूर पिक मात्र शेताचे बांधावर घेतले जात आहे. खरीप हंगामातील सर्व पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अलिकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे योग्यवेळी व प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. पावसाने साथ दिली तर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. किटकनाशकांच्या फवारणी किंवा धुरळणीनंतरही किडीचा नायनाट होत नाही.पवनी तालुक्यात जल व अजल असे एकूण भातपिकाचे क्षेत्र २८,८१७.८४ हेक्टर एवढे आहे. सोयाबीन २,९०८.८८ अजल क्षेत्रात पेरले जाते. उन्हाळी भात २००५.२५ हेक्टर क्षेत्रात जल क्षेत्रात लागवड करण्यात येते. हरभरा पिकासाठी जल व अजल असे एकूण ९५७.१९ हेक्टर क्षेत्र वापरात आहे. गहू पिकासाठी जल व अजल मिळून एकूण ३०३९.६१ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे आणि तूर पिकासाठी ९८२.०५ हेक्टर अचल क्षेत्र वापरात आहे. उर्वरीत इतर सर्व पिकांसाठी जल व अजल मिळून ७१६९.२३ हेक्टर क्षेत्र वापरले जात आहे. तालुक्यात खरीप व रब्बी पिकासाठी जल व अजल असे एकूण ४२९२७.११ हेक्टर क्षेत्र वापरात आहे.शेतात कोणतेही पीक घेतले तरी पावसाचे पाणी किंवा सिंचन आवश्यक आहे. पावसाचे पाणी योग्यवेळी व पुरेशा प्रमाणात न झाल्यास तसेच सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे उत्पादनात घट ही नित्याची बाब झालेली आहे. पिकांवरील रोगाचे विविध प्रकार पाहून शेतकरी हैराण झालेला आहे. दरवर्षाला शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च किटकनाशकांच्या फवारणीवर होत असल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)