शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा होरपळला

By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST

तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते.

शेतकरी हवालदिल : पहिल्या पावसानंतर किडीने मारले, बॅका कर्ज देईना-निसर्ग साथ देईनापवनी : तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते. धान, सोयाबीन व गहू ही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हरभरा व तूर या पिकांना सिंचन असलेल्या जमिनीचा वापर केला जातो. परंतु तूर पिक मात्र शेताचे बांधावर घेतले जात आहे. खरीप हंगामातील सर्व पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अलिकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे योग्यवेळी व प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. पावसाने साथ दिली तर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. किटकनाशकांच्या फवारणी किंवा धुरळणीनंतरही किडीचा नायनाट होत नाही.पवनी तालुक्यात जल व अजल असे एकूण भातपिकाचे क्षेत्र २८,८१७.८४ हेक्टर एवढे आहे. सोयाबीन २,९०८.८८ अजल क्षेत्रात पेरले जाते. उन्हाळी भात २००५.२५ हेक्टर क्षेत्रात जल क्षेत्रात लागवड करण्यात येते. हरभरा पिकासाठी जल व अजल असे एकूण ९५७.१९ हेक्टर क्षेत्र वापरात आहे. गहू पिकासाठी जल व अजल मिळून एकूण ३०३९.६१ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे आणि तूर पिकासाठी ९८२.०५ हेक्टर अचल क्षेत्र वापरात आहे. उर्वरीत इतर सर्व पिकांसाठी जल व अजल मिळून ७१६९.२३ हेक्टर क्षेत्र वापरले जात आहे. तालुक्यात खरीप व रब्बी पिकासाठी जल व अजल असे एकूण ४२९२७.११ हेक्टर क्षेत्र वापरात आहे.शेतात कोणतेही पीक घेतले तरी पावसाचे पाणी किंवा सिंचन आवश्यक आहे. पावसाचे पाणी योग्यवेळी व पुरेशा प्रमाणात न झाल्यास तसेच सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे उत्पादनात घट ही नित्याची बाब झालेली आहे. पिकांवरील रोगाचे विविध प्रकार पाहून शेतकरी हैराण झालेला आहे. दरवर्षाला शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च किटकनाशकांच्या फवारणीवर होत असल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)