शेतकरी हवालदिल : पहिल्या पावसानंतर किडीने मारले, बॅका कर्ज देईना-निसर्ग साथ देईनापवनी : तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते. धान, सोयाबीन व गहू ही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हरभरा व तूर या पिकांना सिंचन असलेल्या जमिनीचा वापर केला जातो. परंतु तूर पिक मात्र शेताचे बांधावर घेतले जात आहे. खरीप हंगामातील सर्व पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अलिकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे योग्यवेळी व प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. पावसाने साथ दिली तर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. किटकनाशकांच्या फवारणी किंवा धुरळणीनंतरही किडीचा नायनाट होत नाही.पवनी तालुक्यात जल व अजल असे एकूण भातपिकाचे क्षेत्र २८,८१७.८४ हेक्टर एवढे आहे. सोयाबीन २,९०८.८८ अजल क्षेत्रात पेरले जाते. उन्हाळी भात २००५.२५ हेक्टर क्षेत्रात जल क्षेत्रात लागवड करण्यात येते. हरभरा पिकासाठी जल व अजल असे एकूण ९५७.१९ हेक्टर क्षेत्र वापरात आहे. गहू पिकासाठी जल व अजल मिळून एकूण ३०३९.६१ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे आणि तूर पिकासाठी ९८२.०५ हेक्टर अचल क्षेत्र वापरात आहे. उर्वरीत इतर सर्व पिकांसाठी जल व अजल मिळून ७१६९.२३ हेक्टर क्षेत्र वापरले जात आहे. तालुक्यात खरीप व रब्बी पिकासाठी जल व अजल असे एकूण ४२९२७.११ हेक्टर क्षेत्र वापरात आहे.शेतात कोणतेही पीक घेतले तरी पावसाचे पाणी किंवा सिंचन आवश्यक आहे. पावसाचे पाणी योग्यवेळी व पुरेशा प्रमाणात न झाल्यास तसेच सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे उत्पादनात घट ही नित्याची बाब झालेली आहे. पिकांवरील रोगाचे विविध प्रकार पाहून शेतकरी हैराण झालेला आहे. दरवर्षाला शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च किटकनाशकांच्या फवारणीवर होत असल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)
निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा होरपळला
By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST