शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

अनुभवी अधिकारी महसूल विभागाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:55 IST

शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : उपजिल्हाधिकारी उरकुडे यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे. उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी निवडणूक शाखेत अतिशय उत्तम काम केले असून त्यांचा अनुभवाचा फायदा या पुढेही मिळत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी निवृत्त झाले असून त्यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, माणसाच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या कामात उमटत असते. विजय उरकुडे यांनी महसूल खात्याची उत्तम सेवा केली असून त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असाच आहे. निवडणूक शाखा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून उरकुडे हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिळत राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन विजय उरकुडे यांचा सत्कार केला.सत्काराला उत्तर देतांना विजय उरकुडे म्हणाले, शासन सेवेत आल्यानंतर महसूल विभागाने आपल्याला ओळख दिली. या खात्याने खुप अनुभव दिले. शासनात खुप काही शिकता आल्याचा आनंद आहे. शासकीय सेवेत बरे वाईट असे अनेक अनुभव आले असले तरी चांगले अनुभव कायम स्मरणात राहीले आहेत. शासन सेवेत असंख्य चांगली माणसं भेटली असून विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या रुपाने अतिशय मनमिळावू व अनुभव संपन्न नेतृत्वात काम करण्याचे भाग्य लाभल्याचे उरकुडे म्हणाले.शासन सेवेत निवृत्ती अपरिहार्य असली तरी काही अधिकारी त्यांच्या कामामुळे कायम स्मरणात राहतात. त्यांचे अनुभव येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असतात. असेच व्यक्तीमत्व विजय उरकुडे असून त्यांच्या सोबत गेल्या अनेक वषार्पासून काम करतांना अनेक बाबी अनुभवायला मिळाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसिलदार गजेंद्र बालपांडे यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.