शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:56 IST

लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.

ठळक मुद्देरणधुमाळी लोकसभेची : जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार नामनिर्देशनपत्रे २५ मार्च पर्यंत (सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत स्विकारले जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. दरम्यान ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. भंडारा येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वतीने निवडणूकीशी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना पोलीस बहुउद्देशिय सभागृहात निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ मार्चनामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजतापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज स्विकारली जाणार आहेत. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी १२ हजार ५०० रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा शासकीय कोषागार येथे चालानद्वारे भरावी, धनादेश स्विकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चालान सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकतात.