शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकॅशलेस प्रणाली लागू होणार : ऑटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझा उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : महामार्गावरुन प्रवास करताना तासनतास टोलनाक्यावर ताटकळत थांबावे लागत होते. परंतु आता टोल टॅक्स जमा करण्याकरिता रांगेत लागण्याची व तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरण अंतर्गत येणाऱ्या सर्व वाहनाना डिसेंबर २०१९ पासून कॅशलेस करण्याची तयारी सुरू प्रशासनाकडून करण्यात आली आहे.सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे.चीपकार्ड लावलेल्या वाहनांना टोल प्लॉझावर पोहचताच तेथे असणाऱ्या स्कॅनर चीपला स्कॅन होवून आॅटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझाचा गेट उघडला जाणार असल्याने यामुळे वाहनधारकांची त्रासातून सुटका होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन मालकांच्या बँक खात्यातून रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना कॅश देण्याची गरज पडणार नाही. अनेक ठिकाणी टोल प्लॉझावर टॅक्स जमा करावा लागतो. मात्र तासनतास वाहनांच्या रांगा व सुट्या पैशाच्या कारणांवरुन एनएचएआयने निर्णय घेतला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त नवीन तयार केलेल्या मार्गांवर ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. टोल नाल्यावर चार चाकी वाहन व जड वाहनांना वाहनकोंडीमुळे तेथून निघणे त्रासदायक होत होते. वाहनधारकांची होणारी समस्या लक्षात घेत केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीमध्येया संदर्भात अंमलबजावणीसाठी माहिती दिली आहे. त्यामुळे आता अनेक मार्गावरील टोल प्लॉझावर लागणाºया लांबच लांब रांगेपासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. चिल्लर पैशामुळे होणारे वादविवाद आता कमी होण्यास मदत मिळणार आहे. सहापदरी व चारपदरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या बांधकामाच्या खर्चानुसार विविध रस्त्यांवर वेगवेगळ्या रक्कमेच्या स्वरुपात टोलरक्कम मोजावी लागणार आहे.जनतेच्या तसेच वाहन चालकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने टोलसंदर्भात नवीन व्यवस्था लागू केली आहे. ज्याची सध्या चाचपणी सुरु आहे. त्याकरिता वाहनांमध्ये फॉस्टटॅग चीप लावण्यात येणार असून याकरिता विविध कंपन्यांचे एजेंट टोलनाक्यावर उपस्थित राहून वाहन चालकांना त्याच्यासाठी लागणारा खर्च घेवून फॉस्टटॅग चीप लावून देतील.-धीरज दीक्षित, टोल व्यवस्थापक, साकोली.

टॅग्स :tollplazaटोलनाका