शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किटाडीलगतच्या जंगलात लागला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

मुखरू बागडे पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन ...

मुखरू बागडे

पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात बुधवारी रात्री वन अधिकारी, कर्मचारी, वनमजुरांना यश आले. हा वणवा नैसर्गिक की मानवनिर्मित, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

लाखनी तालुक्यात किटाळी परिसरात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यात किटाडी, रेंगोळा, पुरखाबोडी, डोंगरगाव, मांगली आदी गावाशेजारी वनसंपदा आहे. यात वन्य प्राणीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. तीन दिवसांपूर्वी या परिसरात आग लागल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती वन विभागाला देण्यात आली. वणवा विझविण्यासाठी १५ कर्मचारी, मजुरांच्या सहकार्याने वणव्यावर नियंत्रण मिळविणे सुरू झाले. ब्लोअर मशीनच्या साहाय्याने आग विझविणे सुरू झाले. तब्बल तीन दिवसानंतर बुधवारी रात्री ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. राखीव वनातील सुमारे ३० हेक्‍टर क्षेत्रात आग लागल्याची माहिती अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी दिली. जंगलाशेजारील गावातील नागरिकांनी वनसंपदेची काळजी घेत वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर पुरकाबोडीचे वनपाल दिगंबर ठोंबरे म्हणाले, या आगीत नेमके किती हेक्टरवर नुकसान झाले, याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर नुकसानीचा आकडा कळेल असे त्यांनी सांगितले.

बॉक्स

वणवा कृत्रिम की मानवनिर्मित?

अलीकडे जंगलात आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आग लागू नये यासाठी वन विभागाने फायर लाईनसह विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही आगीच्या घटना घडत आहेत. जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी आग लावण्याचे प्रकार नवीन नाही. तसेच अनावधानाने ही आगी लागतात. मात्र किटाडीलगतच्या जंगलात लागलेली आग मानवनिर्मित असल्याची चर्चा आहे. वन विभागाने या आगीच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.