शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर ...

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़. तालुक्यात पागोरा, गोलेवाडी, सोनेगाव, वाकेश्वर, रावणवाडी, एटेवाई, खापा, मौदी, नवरगाव, मेंढा, श्रीनगर, बोरगाव (खुर्द) या गावांत जंगले आहेत़.

रावणवाडी, खापा, मेंढा, पागोरा या जंगलात ससे, हरिण, वाघ, रानवराह असे अनेक प्राणी होते; परंतु आता जंगलाचे प्रमाणे कमी होत असून, या वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. जंगलातील प्राणी आपला मोर्चा गावाकडे वळवीत असून, १० ते १५ वर्षांपूर्वी जंगलातून एकटे-दुकटे जाणे शक्य नव्हते; पण आजघडीला वन्यप्राणी कमी झालेले आहेत़.

याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे व वनौषधी मिळत होती; पण ते वृक्ष आता दिसत नाहीत. सोबतच आवळा, बेहडा, हिरडे, बेल, येरुन्या, चार, करवंद, टेंभर, सिंदोळे, चिचबिलाई अशी फळझाडेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़.

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होईल, असे वाटते. वने ओसाड होत चालली आहेत. मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वृक्ष लागवडीसाठी शासन प्रयत्न व नवनवीन उपक्रम राबविते. शासनाचेच अधिकारी जंगलमाफियांना वृक्षतोडीचे परवाने देत आहे. त्यामुळे कितीही नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल तरी त्याचा काहीच फायदा होत नाही.