शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वैद्य दाम्पत्याने लावला बँकेला सात कोटींचा चुना

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय वाढावा यासाठी भंडारा येथील वैद्य दांपत्याने देना राष्ट्रीयकृत बँकेकडून सात कोटी रूपयांचे कर्ज घेतले.

वरठीत गुन्हा दाखल : धान्य खरेदी-विक्रीसाठी घेतले कर्जलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय वाढावा यासाठी भंडारा येथील वैद्य दांपत्याने देना राष्ट्रीयकृत बँकेकडून सात कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यानंतर व्यवसाय डबघाईस आल्याचे कारण पुढे करून त्यांनी कर्ज थकीत ठेवले. यामुळे बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी वैद्य दांपत्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हे दाखल केल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील पुष्पक कॉम्प्लेक्स रहिवासी सोपान राघोबा वैद्य व शुभांगी सोपान वैद्य असे बँकेची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनी भंडारातील देना बँकेकडून सात कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. ते थकीत ठेऊन बँकेची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक अशोक निमजे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविला आहे.सोपान वैद्य यांची विश्वास अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रो राईस मिलींग प्रोसेसिंग व धान खरेदी विक्री मिल पाहुणी येथे आहे. शुभांगी वैद्य यांच्या नावाने श्रद्धा राईस मिल व प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे. दोन्ही दांपत्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या नावावर धान्य खरेदी विक्रीचा व्यवसायासाठी भंडारा येथील देना बँकेकडून सात कोटी रूपयांचे सीसी लिमीट घेतले होते. हा व्यवहार मे २०१४ मध्ये वैद्य दाम्पत्यांनी देना बँकेशी केला होता. यात सोपान वैद्य यांनी तीन कोटी तर शुभांगी वैद्य यांनी चार कोटी रूपयांचे कर्ज उचलले होते. या कर्जापोटी त्यांनी धान खरेदी, ट्रेडींग, मिलिंग करून आलेली रक्कम बँकेच्या कर्जापोटी परतफेड करणे असा नियमित व्यवहार करायचा होता. मात्र वैद्य दांपत्यांनी आॅगस्ट २०१६ पासून बँकेशी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला नाही. त्यामुळे बँकेने वैद्य दाम्पत्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना केल्या. तशा नोटीसही बजावण्यात आले. मात्र वैद्य दाम्पत्यांनी त्यांचा व्यवसाय डबघाईस आल्याने कर्जाची परतफेड करता येणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान या दाम्पत्यानी त्यांच्या मिलींगवर लाखो रूपयांचा धान्यसाठा खरेदी केल्यानंतर तो परस्पर विकून पैसा कमाविला. मात्र बँकेला पैसे परत न केल्यामुळे बँकेची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच बँकेचे व्यवस्थापक अशोक निमजे यांनी वैद्य दाम्पत्यांशी संपर्क साधला. मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेची सात कोटी रूपयांनी फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच सदर प्रकरणात एनपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. बँकेची रक्कम परत न केल्याप्रकरणी अशोक निमजे यांनी वरठी पोलीस ठाण्यात सोपान वैद्य व शुभांगी वैद्य यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांनी भादंवि ४०६, ४०९, ४२० कलमान्वये वैद्य दांपत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे हे करीत आहेत.