शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामात मुरूमऐवजी पांढऱ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक ...

ठळक मुद्देबांधकामावर प्रश्नचिन्ह : जांब-मोहाडी ते मुंढरी राज्यमार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक प्रकारच्या त्रृट्या करण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या पॅचेसमध्ये मुरुमाऐवजी पांढरी माती टाकण्यात येत असल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार होत आहे. या बांधकामाची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजेश गभणे, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे यांनी केली आहे.जांब- आंधळगाव- मोहाडी- कुशारी ते मुंढरी-साकोली पर्यंत दोन पदरी राज्यमार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी वैनगंगा नदीवर रोहा येथे मोठा पूलही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे भूमिपूजन लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईगडबडीत करण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला अंदाजे तीन फूट खोल व पाच फूट रुंद असे खोदकाम एक महिन्याआधी पूर्वीच करून ठेवण्यात आले होते. या खोदकामात मुरूम टाकणे आवश्यक असताना येथे भिसमिश्रीत माती टाकली जात आहे, त्यामुळे या रस्त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.या रस्त्याचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंट्रक्शन कंपनी तर्फे संपूर्ण रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत. रस्त्याच्या कामात अनेक प्रकारच्या अनियमितता आहेत. बांधकामाच्या सुरवातीलाच जर पैसे वाचविण्यासाठी इस्टीमेट प्रमाणे काम न करता मनमर्जीप्रमाणे कामे करण्यात येतील तर, त्या रस्त्याचा दर्जा कसा राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.बांधकाम सुरु असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाचे कंत्राट कोट्यवधी रूपयांचे आहे. या रस्त्याचे सर्व सूत्र संचालन वरच्या स्तरावरुन होत असल्याचे समजते. त्यामुळे कोणीही कितीही ओरडले तरी कंत्राटदार आपल्याच मर्जीने कामे करेल असे जनतेचे म्हणणे आहे. मात्र या रस्त्यावर होणारा खर्च हा जनतेच्या खिश्यातून गेलेल्या पैश्यातून होत असल्याने व या रस्त्यावरुन येथील जनतेलाच जाणे येणे करायचे असल्याने हा रस्ता दर्जेदार तयार व्हावा, अशी अपेक्षा येथील जनता बाळगून आहे.राज्यमार्गाचे बांधकाम निकृष्ठ होत आहे. रस्ता बांधकाम करताना शासन आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. परिणामी नागरिकांना रस्त्याच्या दूरवस्थेचा सामना करावा लागेल. त्यामुळे होत असलेल्या कामावर बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी राजेश गभने, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे आदींनी केली आहे.