शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

रस्ता बांधकामात मुरूमऐवजी पांढऱ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक ...

ठळक मुद्देबांधकामावर प्रश्नचिन्ह : जांब-मोहाडी ते मुंढरी राज्यमार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक प्रकारच्या त्रृट्या करण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या पॅचेसमध्ये मुरुमाऐवजी पांढरी माती टाकण्यात येत असल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार होत आहे. या बांधकामाची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजेश गभणे, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे यांनी केली आहे.जांब- आंधळगाव- मोहाडी- कुशारी ते मुंढरी-साकोली पर्यंत दोन पदरी राज्यमार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी वैनगंगा नदीवर रोहा येथे मोठा पूलही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे भूमिपूजन लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईगडबडीत करण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला अंदाजे तीन फूट खोल व पाच फूट रुंद असे खोदकाम एक महिन्याआधी पूर्वीच करून ठेवण्यात आले होते. या खोदकामात मुरूम टाकणे आवश्यक असताना येथे भिसमिश्रीत माती टाकली जात आहे, त्यामुळे या रस्त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.या रस्त्याचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंट्रक्शन कंपनी तर्फे संपूर्ण रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत. रस्त्याच्या कामात अनेक प्रकारच्या अनियमितता आहेत. बांधकामाच्या सुरवातीलाच जर पैसे वाचविण्यासाठी इस्टीमेट प्रमाणे काम न करता मनमर्जीप्रमाणे कामे करण्यात येतील तर, त्या रस्त्याचा दर्जा कसा राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.बांधकाम सुरु असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाचे कंत्राट कोट्यवधी रूपयांचे आहे. या रस्त्याचे सर्व सूत्र संचालन वरच्या स्तरावरुन होत असल्याचे समजते. त्यामुळे कोणीही कितीही ओरडले तरी कंत्राटदार आपल्याच मर्जीने कामे करेल असे जनतेचे म्हणणे आहे. मात्र या रस्त्यावर होणारा खर्च हा जनतेच्या खिश्यातून गेलेल्या पैश्यातून होत असल्याने व या रस्त्यावरुन येथील जनतेलाच जाणे येणे करायचे असल्याने हा रस्ता दर्जेदार तयार व्हावा, अशी अपेक्षा येथील जनता बाळगून आहे.राज्यमार्गाचे बांधकाम निकृष्ठ होत आहे. रस्ता बांधकाम करताना शासन आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. परिणामी नागरिकांना रस्त्याच्या दूरवस्थेचा सामना करावा लागेल. त्यामुळे होत असलेल्या कामावर बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी राजेश गभने, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे आदींनी केली आहे.