शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

धान साठविण्यासाठी शाळा समाज मंदिराचा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ...

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.भंडारा : रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची पुरेशी सुविधा नसल्याने कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा आणि समाज मंदिराचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण प्रशानाला दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.

बॉक्स

कितीही विरोध केला तरी जम्बो कोविड सेंटर होणारच

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडाला होता. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. काहींचा बळी गेला. हीच परिस्थिती पुन्हा उदभवून नये. सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी वरठी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. ५०० ऑक्सिजन खाटांची सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला काहींचा विरोध आहे. मात्र पैसा कितीही लागला तरी चालेल. सामान्यांचा जीव वाचला पाहिजेच. म्हणूनच कोणी कितीही विरोेध केला तरी कोविड सेंटर उभारणारच, असे नाना पटोले म्हणाले. जिल्हा रुग्णालयात ३५० मॅट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॉट तालुका ठिकाणी उभारले जात आहे. याचा फायदा सर्वसामान्य जनतेलाच होणार आहे.