शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सेवानिवृत्तांच्या अनुभवाचा वापर होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:32 IST

पोलीस विभागाचे आधुनिकीकरण झाले. पोलीस दलात अनेक नवीन हत्यारे आली. परंतु, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या विभागात घालविले त्यांच्या अनुभवाचे महत्व मोजले जाऊ शकत नाही.

ठळक मुद्देविनीता साहू यांचे प्रतिपादन : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : पोलीस विभागाचे आधुनिकीकरण झाले. पोलीस दलात अनेक नवीन हत्यारे आली. परंतु, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या विभागात घालविले त्यांच्या अनुभवाचे महत्व मोजले जाऊ शकत नाही. या अनुभवाचा वापर झाला पाहीजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन नागपूर जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने रविवारी येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्र माचे उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक विनीता साहू तर प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष रमेश मेहता, सचिव सुरेश महाले, सहसचिव नागेश घोडकी, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विवेक कुरवाडे, सेवकराम कोरे, जिल्हाध्यक्ष शालिकराम झंझाड, मुख्य मार्गदर्शक पुंडलिक निखाडे उपस्थित होते. विनीता साहू पुढे म्हणाल्या, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अनुभव समुद्रासारखे असते.जिल्ह्यात अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो, तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपण घेऊ शकतो. आजच्या समस्यांचा तोडगा त्यांच्या अनुभवात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात रिटार्यमेंट येत असते. परंतु, चांगले काम करणाऱ्यांसाठी रिटार्यमेंट लागूच होत नाही. आजच्या या मेळाव्यातून सेवानिवृत्त कर्मचारी एकसंघ असल्याचे दिसून येते.महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी संघटनेला आपण मजबूत बनवू. याशिवाय संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक बैठक घेऊ, असे त्यांनी नमूद केले. यावेळी पंच्याहत्तरी ओलांडलेल्या २३ सेवानिवृत्त पोलिस कर्मचाºयांचा व सन २०१७ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या ४३ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्तविक अरविंद हलमारे यांनी तर संचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शालिकराम झंझाड यांनी केले. कार्यक्रमासाठी ज.ग. नवखरे, ग. शा. भोवते, ध.सा. कोचे, प्र.स. तिरपुडे, नारायण माकडे, भिमराव उंदिरवाडे, हरिभाऊ ईश्वरकर, रवी लांजेवार, अमरसिंग राठोड, भाऊराव कोचे, भाऊराव बंसोड, बुधाजी निरगूडे, वसंतराव मडावी, विठोबा मेश्राम, रामकृष्ण माहूले, लक्ष्मीनारायण दोनोडे, अक्सार शेख, दुर्याेधन कडव, युवराज सिंगनजुडे, अरविंद हलमारे, यादोराव गणवीर, अरविंद मेश्राम, नामदेवराव ठोंबरे, भगवान वंजारी, महादेव पटले, नंदकिशोर माहूर्ले, मनोरमा बन्सोड, वसंतराव गाढवे, सुधाकर रोटकर आदींनी सहकार्य केले.