शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:58 IST

संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.

ठळक मुद्दे‘युझ अ‍ॅण्ड थ्रो’ची सवय : अनिर्बंध वापरावर अंकुश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.शासनाने १ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही.वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जावून पाणीसाठे, जंगल आणि जमीनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषीत करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.प्लास्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्य प्राणी आहेत. हे प्राणी प्लास्टिकच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांनी प्लास्टिक भक्ष्यण केले तर त्यांनाही धोका होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने ठरविले तर प्लास्टिकपासून मुक्ती मिळू शकते यासाठी जनजागृतीची गरज आहे. यासोबतच कायद्याची अमंलबजावणी कडक करण्याची गरज आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास येथील पर्यावरण प्रेमी वसुंधरा फाळके यांनी केला आहे. यात त्यांनी प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामावर प्रकाश टाकला. प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून प्लास्टिकचा वापर टाळल्यास पर्यावरणाची होणारी हानी टाळता येऊ शकते.प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही. याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. त्यासाठी प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.-वसुंधरा फाळके,पर्यावरण अभ्यासक, भंडारा

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी