शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या खडीकरणात निकृष्ट साहित्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 00:41 IST

करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले.

उपोषणाचा इशारा : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन करडी (पालोरा) : करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले. सदर काम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्याचे निवेदन अनेकदा देण्यात आले. मात्र ग्रामपंचायत कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे २८ एप्रिलपर्यंत या कामाची चौकशी न झाल्यास १ मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या नवेदनातून दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कामांचा दावा केला जात आहे. मात्र सत्तापक्षांच्या लोकांनीच या दाव्यातील हवा काढली असल्याचे करडी येथील कामात झालेल्या गैरप्रकारावरून दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या खडीकरण कामात गैरप्रकार केलेला असताना त्यांना वाचविण्याचे काम राजकीय मंडळींकडून होत आहे. अखेर धरणे आंदोलन व उपोषणाचा, शांततेचा व अहिंसेचा मार्ग पत्करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. करडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून आंबेडकर वॉर्डात गॅस गोडावून ते राममंदिर पर्यंतच्या खडीकरणाचे काम हाती घेतले गेले. नुकतेच काम पूर्ण करण्यात आले. कामे ग्रामपंचायत सदस्यांनीच केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. खडीकरणाचे काम करताना अंदाजपत्रकाला मुठमाती दिली गेली. अंदाजपत्रकात खडीकरणासाठी ८० एमएम खडीचा वापर करावयाचा होता. मात्र तसे करण्यात आलेले नाही. फक्त ४० एमएम खडीचा पातळ थर टाकून त्यात मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर करून रस्त्याचे काम केले. अंदाजपत्रकाप्रमाणे ९ इंचिचा कोड देणे आवश्यक असताना फक्त ४ इंचीचा कोट देण्यात आला. खडीकरण कामातील गैरप्रकाराची माहिती संबंधित विभागाच्या अभियंत्याला देण्यात आली. मात्र, अद्याप त्याची चौकशी झालेली नाही. त्यामुळे उपोषाला बसण्याचा इशारा ज्ञानेश्वर हिंगे, अजय तितीरमारे, सुशिल ढोमणे, ग्रामपंचायत सदस्य रंजीत भारतकर, अयुब शेख, शिवशंकर साठवणे, दिलीप पोवनकर, प्रदीप साखरे, अमोल डोहळे व ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)