शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

रस्त्याच्या खडीकरणात निकृष्ट साहित्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 00:41 IST

करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले.

उपोषणाचा इशारा : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन करडी (पालोरा) : करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले. सदर काम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्याचे निवेदन अनेकदा देण्यात आले. मात्र ग्रामपंचायत कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे २८ एप्रिलपर्यंत या कामाची चौकशी न झाल्यास १ मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या नवेदनातून दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कामांचा दावा केला जात आहे. मात्र सत्तापक्षांच्या लोकांनीच या दाव्यातील हवा काढली असल्याचे करडी येथील कामात झालेल्या गैरप्रकारावरून दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या खडीकरण कामात गैरप्रकार केलेला असताना त्यांना वाचविण्याचे काम राजकीय मंडळींकडून होत आहे. अखेर धरणे आंदोलन व उपोषणाचा, शांततेचा व अहिंसेचा मार्ग पत्करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. करडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून आंबेडकर वॉर्डात गॅस गोडावून ते राममंदिर पर्यंतच्या खडीकरणाचे काम हाती घेतले गेले. नुकतेच काम पूर्ण करण्यात आले. कामे ग्रामपंचायत सदस्यांनीच केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. खडीकरणाचे काम करताना अंदाजपत्रकाला मुठमाती दिली गेली. अंदाजपत्रकात खडीकरणासाठी ८० एमएम खडीचा वापर करावयाचा होता. मात्र तसे करण्यात आलेले नाही. फक्त ४० एमएम खडीचा पातळ थर टाकून त्यात मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर करून रस्त्याचे काम केले. अंदाजपत्रकाप्रमाणे ९ इंचिचा कोड देणे आवश्यक असताना फक्त ४ इंचीचा कोट देण्यात आला. खडीकरण कामातील गैरप्रकाराची माहिती संबंधित विभागाच्या अभियंत्याला देण्यात आली. मात्र, अद्याप त्याची चौकशी झालेली नाही. त्यामुळे उपोषाला बसण्याचा इशारा ज्ञानेश्वर हिंगे, अजय तितीरमारे, सुशिल ढोमणे, ग्रामपंचायत सदस्य रंजीत भारतकर, अयुब शेख, शिवशंकर साठवणे, दिलीप पोवनकर, प्रदीप साखरे, अमोल डोहळे व ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)