शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

अवकाळी पावसाने वाढवली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हवामान खात्याने जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. शुक्रवार ते रविवार दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका या पिकांना फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला. जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, पावसाने भाजीपाला उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले, तर शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेले २९ लाख क्विंटल धानसुद्धा उघड्यावर पडलेले असून, या धानालाही काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.