शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

अवकाळी पावसाने वाढवली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हवामान खात्याने जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. शुक्रवार ते रविवार दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका या पिकांना फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला. जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, पावसाने भाजीपाला उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले, तर शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेले २९ लाख क्विंटल धानसुद्धा उघड्यावर पडलेले असून, या धानालाही काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.