शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

विनापरवाना वृक्षतोडीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 12, 2016 00:51 IST

काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे.

अड्याळ : काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधित झाल्याने त्या शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कंत्राटदारांना विकत आहेत.इमारतीचे लाकूड व फर्निचर बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य वृक्षांची कत्तल होत आहे. भंडारा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. ५० वर्षांपूर्वी भंडारा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात खापा, रावणवाडी, बोरगाव, एटेवाही, पागोरा, मिन्सी इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत. जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडी वर करोडो रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजीविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडेही तोडू लागली आहेत. (वार्ताहर)